पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

कुछ तो लोग कहेंगे – उस्ताद आनंद बक्षी

इमेज
गीतकार आनंद बक्षी यांना उस्ताद म्हणणं अगदी योग्य वाटतं मला, कारण जीवनाशी संबंधित अनेक मूल्यं, वास्तव त्यांनी शब्दांच्या जादूने पडद्यावर मांडली. समकालीन गीतकार ज्यामध्ये कवी असणारे मजरूह, कैफी आझमी यांच्या विषयी त्यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते ते त्यांच्या कामावरील निष्ठा दाखवते, ते म्हणाले होते, “कवी हा स्वत:च्या कल्पनेतून लिहितो, मी कथा, पात्र आणि परिस्थितीतून प्रेरित होऊन लिहितो.” कामाप्रती असणारं समर्पणच दिसतं यातून, म्हणूनच चार दशकं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, ५५० चित्रपट आणि ४००० गीतांद्वारे चित्रपट सृष्टीत योगदान देणारे आनंद बक्षी हे विरळच !! २१ जुलै १९३० रोजी अखंड हिंदुस्थानच्या रावलपिंडी (आता पाकिस्तान मध्ये) येथे त्यांचा जन्म झाला, परंतु फाळणी नंतर हिंदू शरणार्थी म्हणून हिंदुस्थानात आले. आनंदजी यांचे वडील रावलपिंडी येथे एका बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते, घरात सर्वजण त्यांना नंदू म्हणून हाक मारत असतं, त्यांना आनंद प्रकाश म्हणून ओळखलं जात असे पण त्यांचे मित्र-परिवार त्यांना आनंद बक्षी म्हणून संबोधत असत. फाळणी नंतर बक्षी कुटुंब दिल्ली येथे आले आणि...