पोस्ट्स

आज वाचा

विद्या कॉम्प्युटर्स: २६ वर्षांचा विश्वास, ज्ञानसाधना आणि Ai Ready Career Institute ची यशोगाथा

इमेज
आणखी एक वर्ष ! वर्षाचे ३६५ दिवस पूर्ण करून नवा दिवस ! नवी ऊर्जा, नवा उत्साह, नव्या कल्पनांसह , नव्या तंत्रज्ञानाचे दीप हाती घेऊन पुढील ज्ञानपर्वाच्या वाटेवर मार्गस्थ होणे, नक्कीच अभिमानास्पद आहे, वाढलेली जबाबदारी खूप मोठी आहे. अर्थात याचे भान आम्हाला आहे. जुळे सोलापूर परिसरात ८० चौ. फुटा पासून सुरू झालेला प्रवास आज २००० चौ फुटात दिमाखात सुरू आहे. विद्या कॉम्प्युटर्स २६ वर्षांचं झालं !  तसं पाहिलं तर खूप मोठा पल्ला, ९४९० दिवस, १ लाखा पेक्षा जास्त सोलापूरकरांच्या हृदयात स्थान मिळविणं हे आमचं सर्वात मोठं यश मानतो आम्ही.  सोलापूरकरांच्या मनो विश्वात आशा, विचार आणि नव चैतन्याचा प्रकाश पेरण्याचे पवित्र कार्य आम्ही केले , करीत आहोत. सोलापूरकरांचा आशीर्वाद असाच सोबत करेल याची काडीमात्र शंका आमच्या मनात नाही आणि त्याच बळावर आम्ही आमची वाटचाल अशीच सुरू ठेवू. आयुष्यातील महत्वाची वर्षं या वाटचालीत उपयोगात आणली गेली. पदव्युत्तर शिक्षण झालेले असताना देखील सोलापूर शहर न सोडता, येथेच राहून संगणक शिक्षण, स्किल प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान...

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

इमेज
  “ सोलापूर” हे नाव उच्चारताच मनात अनेक परिचयाच्या गोष्टी उजळून निघतात—टेक्सटाइल उद्योगाचे भक्कम केंद्र , हुतात्म्यांच्या त्यागाने पावन झालेली भूमी , श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाछायेत न्हालेली नगरी आणि महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात वेगाने पुढे येणारे शहर. या सर्व ओळखींसोबतच , मागील दोन दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात सोलापुरात घडलेले परिवर्तन विशेषत्वाने नोंद घ्यावे असे आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांतून आकारास आलेले स्वतंत्र विद्यापीठ , नव्याने उभारलेली तंत्रमहाविद्यालये , तसेच खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून विस्तारलेले उच्च शिक्षणाचे दालन—या सर्वांनी मिळून सोलापूरला शिक्षणसमृद्ध शहराची नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. साक्षरतेच्या आकडेवारीत सातत्याने दिसणारी वाढ आणि अनेक महाविद्यालयांना प्राप्त झालेला “स्वायत्त” दर्जा हा या प्रगतीचा ठोस पुरावा आहे. एक सोलापूरकर म्हणून हा प्रवास अभिमानाने उर भरून येईल असा आहे. याच शैक्षणिक प्रवासाला पूरक ठरत , शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त , मॉड्युलर स्वरूपातील अभ्या...

पहिली शस्त्रक्रिया : भीती, धाडस आणि शरीराशी झालेला नवा संवाद

इमेज
  हृदयाची वाढणारी धडधड, काळजी आणि पुढे काय आणि कसे होणार? हा अनुत्तरित प्रश्न ! अर्थात उत्तर लागलीच मिळणारच होतं पण मिळेपर्यंत सोबत करणारी एक अनामिक भिती ! हो भीतीच, कारण आयुष्यात प्रथमच एखाद्या ऑपरेशनला सामोरे जात होतो. हॉस्पिटल मध्ये सोबत करणे ठिक असतं,पण ऑपरेटीव प्रोसीजर स्वत:च पाहणे आणि त्यात सामील होणे हे प्रथमच ! त्यामुळे नाही म्हंटल तरी टेंशन आलेलच होतं. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर देखील थोडं वाढलं. ऑपरेशन हा शब्दच मुळी धाडस दर्शवितो, मग ते सैन्य दलात असेल, अथवा हॉस्पिटल ! फार काही नाही पण “धाडस” या शब्दाचा मला चांगला समजलेला अर्थ असा की भिती असतानाही धोक्याचा सामना करण्याची मानसिक ताकद. डॉक्टरांवर विश्वास ठेवला की फार काही धाडस करण्याची गरज नसते पण मनुष्य प्राणी सहजा सहजी असे काही करत नाही, तसा तुम्हालाही अनुभव असावाच !           सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की फार काही “सीरियस” असे घडले नाही, फक्त मी हे प्रथमच फेस केलं म्हणून त्याचं अप्रूप ! बाकी अशा अनेक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात आणि रुग्ण हसत हसतं घरी देखील जातात. मी देखील...

भारत विरुद्ध इंडिया : शिक्षण, एआय आणि हरवलेली दिशा

इमेज
  शहर आणि गांव / खेड यांच्यातील संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये एक मोठी दरी दिसतेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण ! यात देखील एक मोठी दरी पहायला मिळते. भारत आणि इंडिया यातील दरी सतत वाढणारी राहील असे चित्र आजतरी दिसतं आहे. डिजिटल क्रांती भारतात (गावात) आली नाही असे नाही पण अद्याप भारत इंडियाशी जोडलेला नाही हे त्रिवार सत्य आहे.  आता हेच पहा, शिक्षणांवर सर्वांचाच सारखाच अधिकार आहे, पण या भावी पिढीस आपण शिक्षित करीत आहोत की साक्षर ? की दोन्हीही नाही. शिक्षण क्षेत्रात वावरत असताना अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे मुलांना धड वाचताही येत नाही. लिहिणं तर खूप दूरची गोष्ट ! तुम्ही म्हणाल, काहीतरी सांगताय पण ही वस्तुस्थिती आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणारे आहेत हे नमूद करणे अनिवार्य आहे. ही मित्र मंडळी उत्तीर्ण कशी झाली? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कितीही कॉपी मुक्त अभियान चालविले तरी नैतिकता कशाशी खातात हे जो पर्यन्त समजणार, शिकणार नाही तो पर्यन्त काहीही फरक पडणार नाही. असे विद्यार्थी त्यांचं शालेय शिक्षण संपवून जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा या स्पर्धेच्या युगात ही मित...

सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड

इमेज
  जिथे आपल्या भावना अलगद गुंतत जातात , तिथे नकळत एक नातं आकार घेतं. त्या नात्याला श्वास घेण्यासाठी मनुष्याचंच अस्तित्व आवश्यक असतं असं नाही. कधी एखादी निर्जीव वस्तूही आपल्या भावविश्वात स्थान मिळवते. तिच्याशी शब्दांविना संवाद साधला जातो , आठवणी गुंफल्या जातात आणि हळूहळू ती आपल्या मनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणूनच भावनांना स्पर्श झाला की नातं निर्माण होणं अटळ ठरतं—ते जिवंत असो वा निर्जीव , नातं मात्र तितकंच खरं असतं. आता हेच पहा ना, १९२२ साली ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला एक पूल , त्याच्याशी एक सोलापूरकर म्हणून काय नातं असू शकतं? म्हंटल तर काहीच नाही, अथवा अनेक आठवणी या सोबत जोडलेल्या असू शकतात. सोलापूरकरांनी अनेक वेळा त्याचां वापर केला, पण कालपरत्वे पूलाची कालमर्यादा संपली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल पाडावा लागणे साहजिकच आहे. आता जमाना सोशल मिडियाचा आहे, या पुलाच्या कार्यकाळात म्हणजे १०३ वर्षात त्यास जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी अवघ्या काही दिवसांत मिळाली. तिथे पूल आहे, ज्याचा वापर आपण करीत आलो आहोत हे देखील सोशल मीडियाने अधोरेखित केले. पूल पाडण्याच्या काही दिव...

माहिती तंत्रज्ञान युगातील मक्तेदारी : संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा- भाग २

इमेज
 पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करावं - माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात मक्तेदारीचा प्रभाव अधिक तीव्र होत चालला आहे. भाग १ मध्ये आपण डिजिटल मक्तेदारीची संकल्पना, तिची कारणे आणि तिच्या वाढीमागील तांत्रिक प्रवाहांचा परिचय घेतला. आता, भाग २ मध्ये आपण त्या मक्तेदारीमुळे निर्माण होणाऱ्या वास्तवातील संधी आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करणार आहोत. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची वाढती सत्ता बाजारपेठेचे स्वरूप कसे बदलते, नवकल्पनांवर कसा परिणाम करते आणि ग्राहकांच्या अधिकारांसमोर कोणत्या अडचणी उभ्या करते, याचा अभ्यास या भागात मांडला आहे. यासोबतच भविष्यातील दिशादर्शन, नियामक ढांचा आणि डिजिटल युगात संतुलित व न्याय्य स्पर्धा कशी राखता येईल हेही पाहणार आहोत. IT युगातील मक्तेदारीचे बदलते चित्र समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ३. तरीही काही कंपन्या प्रभावशाली का ? तांत्रिक क्षेत्रात मक्तेदारी अवघड असली तरी काही कंपन्यांनी प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे: अ. नेटवर्क इफेक्ट्स ( Network Effects) काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर जितके ...

माहिती तंत्रज्ञान युगातील मक्तेदारी : संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा

इमेज
  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका कंपनीची मक्तेदारी राहणे अवघड कारण रोज नव-नवीन संशोधनं होत असतात मग त्यात रोज नव्याने भर पडते ती नवीन उत्तम सॉफ्टवेअर्स ची एकाच प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर देखील सहज उपलब्ध होताना दिसतात. याचा प्रत्यय गुगल (सर्च) केल्यास आपणांस आला देखील असेल, पण स्पर्धात्मक युगात कुण्या एका कंपनीची “मक्तेदारी” सुरु होणं पचनी पडत नाही, त्यास समर्थ असा पर्याय उपलब्ध असणं, होणं खूप महत्वाचं वाटू लागतं. आता हेच पहा ना, संगणका मध्ये इनपुट टूल मध्ये क्रांती आली ती “युनिकोड” मुळे ज्यामुळे मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा सहज गत्या दिसू लागल्या त्याचा तसा वापर ही वाढू लागला. मग प्रथम टाईप रायटर मध्ये ज्याप्रमाणे मराठी कि-बोर्ड लेआउट असतात त्याप्रमाणे मराठी येवू लागले, युनिकोड आल्यानंतर देवनागरी ह्या प्रकारात मराठी झळकू लागले, या नंतर इनस्क्रिप्ट हा प्रकार आणि मग देवनागरी फोनेटिक यामध्ये आपण जसे बोलू तसे टाईप होवू लागले, ज्यास सोप्या भाषेत आपण असे म्हणू कि “इंग्लिश कि-बोर्ड चाच वापर, पण “इंग्लिश टू मराठी” हा सर्वांच्या सोईचा प्रकार एका कंपनी ने देवू केला,यात अजून एक सुधारणा ...