पोस्ट्स

आज वाचा

राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण

इमेज
  राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण भारतभूमीचे आराध्य दैवत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणे म्हणजे त्यांच्या अद्वितीय पराक्रम , धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला अर्पण केलेली एक भावपूर्ण आदरांजली होय. आज पर्यन्त अनेक चित्रपट निर्मात्यानी असा प्रयत्न केला आहे. यासाठी विविध ऐतिहासिक दस्त ऐवज वापरुन आपल्या राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर चितारला आहे. १ मे रोजी रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित झाला. तसा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता पण संध्याकाळचे तिकीट मिळालं, पण ठरविल्या प्रमाणे फर्स्ट डे पाहिला. तसा हा चित्रपट तयार होण्यास दहा वर्षाचा काळ लागला, आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बिग बजेट चित्रपट ! मेगा स्टार कास्ट, भव्य सेट आणि सोबतीला कॉम्प्युटर ग्राफिक्स ! तंत्रज्ञान फार पुढे गेलं आहे, क्रोमा ग्रीनचा वापर केला की संगणकावर सारं कसं सहज साध्य होतं. चित्रपटात महाराजांचे विविध पैलू समोर येतात, महाराजांना पडद्यावर साकारण्याचे धनुष्य पेलण्याचा रितेशने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रितेश आणि त्याचे वडील यांच्यातील नाते संपूर्ण महाराष्ट्रास ...

ब्लॉग मध्ये सामावलेली समृद्धता

इमेज
  आज अनेक दिवसांनंतर ब्लॉगच्या Admin Console ला भेट दिली आणि लक्षात आलं की माझ्या ब्लॉगवर एकूण १९५ लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल म्हणतो खरे पण आपण आजवर या एवढ्या मोठ्या समूहास काय दिलं? तर अनुभव आणि ज्ञान याच्या जोरावर हे लेख ! जे कदाचित कुणासाठी प्रेरणा देऊ करतील, कुणासाठी माहितीचा खजिना म्हणून ज्ञान देऊ करतील. ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे, या देण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे. स्वत:चे कौतुक म्हणून नाही पण वाचन तुम्हाला विचाराने समृद्ध करतं, नवी दिशा देतं आणि प्रेरणाही देतं, ब्लॉगला भेट दिल्यास तुम्हास देखील याची प्रचिती येऊ शकेल. “ समृद्ध ” होणं या पेक्षा काही वेगळं असेल असे नाही वाटत. समृद्धता ही केवळ संपत्ती , वैभव किंवा भौतिक सुखसुविधांची बेरीज नसून , ती जीवनाच्या व्यापक आणि सूक्ष्म पैलूंना स्पर्श करणारी संकल्पना आहे, असे मी मानतो.   ब्लॉगवरील हे लेख कुण्या एकाच विषयावर नाहीत तर त्यात बॉलीवुड, सुलेखन, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, प्रासंगिक, माहितीपर, करिअर विषयक, व्यावसायिक मार्गदर्शन, स्टार्टअप, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान विषयक, मनोगत अ...

तेरे बिना जिंदगी से - भावनांचा संयत आविष्कार

इमेज
  एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोन जीव, नेहमीप्रमाणे (टिपिकल बॉलीवुड स्टाइल) वडिलांचा विरोध, कारण काय तर वडील राजकारणातील मात्तबर व्यक्ति. पक्षात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण ! अशा परिस्थिती मध्ये मुलगी बंड करते आणि त्या सामान्य व्यक्ति ज्याच्यावर तिचे जिवापाड प्रेम असतं त्याच्या सोबत लग्न करते. अर्थात लग्नानंतर वडील मुलीच्या संपर्कात राहतात आणि तिला राजकारणात घेऊन जाण्यात यशस्वी होतात. समाजसेवा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यात आणि राजकारण या पाशात मुलगी पुरती अडकून जाते, दोन जीव वेगळे होतात. योगा –योगाने साधारण नऊ वर्षाने एका हॉटेल मध्ये दोघे पुन्हा भेटतात ! आणि त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो. एव्हाना तुम्हाला चित्रपटाचे नाव लक्षात आलं असेल. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, “आंधी”, याच चित्रपटाची कथा आहे ही. मुलीचे कर्तव्य, पक्षाचे स्वामित्व हे दोन्ही एका पारड्यात आणि नवरा, घर दुसऱ्या   पारड्यात, अर्थात कथेत अभिनेत्रीचे पारडे पक्ष आणि राजकारण याकडे झुकलेलं दाखविण्यात आले आहे.             कुणासही त्याच्या आयुष्यात, त्याने ज्...

स्क्रीनमागील चेहरा: अभिव्यक्ती की असभ्यता?

इमेज
  आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर केवळ संवादापुरता मर्यादित राहिलेला नाही ; तो व्यक्तिमत्त्व , विचारसरणी आणि संस्कारांचे प्रतिबिंब बनला आहे. प्रत्येक पोस्ट , प्रत्येक प्रतिक्रिया आणि विशेषतः केले जाणारे कमेन्टस् हे आपली मानसिकता आणि सामाजिक जाणीव स्पष्ट करतात. दुर्दैवाने , आज सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक कमेन्टस् या अशोभनीय , अपमानकारक आणि संवेदनशून्य असतात. यात आदर , समजूतदारपणा आणि संस्कारांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. “आदर”, म्हणजे काय रे भाऊ? तो कसा व्यक्त करावा हा कदाचित प्रशिक्षणाचा भाग असेल, पण तो करण्यास कुणी मेहरबान होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण एखाद्या व्यक्तीचा “आदर” करणे त्यास योग्य तो मान देणे ही एक भारतीय संस्कृती आहे. कदाचित सोशल मीडियाचा वापर करताना ही संस्कृती कुठे तरी लुप्त होत चालली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हे सारं आभासी जग आहे. कमेन्ट करताना अनेकजण हे विसरतात की समोरही एक माणूस आहे—भावना असलेला , विचार असलेला. स्क्रीनच्या आड लपल्यामुळे शब्दांची जबाबदारी कमी होते , असा गैरसमज तयार झाला आहे. परिणामी , टीका करताना मर्यादा ओलांडल्या जातात , वैयक्ति...

पण, परंतु .. आणि निर्णय

इमेज
  अनेकदा आयुष्यात काही निर्णय आपण त्या क्षणाच्या उपलब्ध साधनांवर , परिस्थितीवर आणि आपल्या समजुतींवर घेतो. त्या वेळी ते निर्णय अगदी योग्य वाटतात. पण काळ पुढे सरकतो , अनुभव वाढतात , आणि मग मागे वळून पाहताना काही प्रश्न मनात ठाण मांडून बसतात—“तो निर्णय योग्य होता का ?”, “ मी वेगळी वाट निवडली असती तर काय झालं असतं ?” अशा प्रश्नांचं ओझं हळूहळू मनावर साचतं आणि एक प्रकारचं ‘शल्य’ मनात निर्माण होतं. खरं तर निर्णय घेताना आपण त्या काळात ‘प्राप्त’ आणि ‘पर्याप्त’ अशा गोष्टींचा विचार करतो. जे मिळालं आहे आणि जे पुरेसं वाटतंय , त्याच्या आधारे आपण पुढे जाण्याचा मार्ग ठरवतो. त्या क्षणी तो निर्णय पूर्णपणे तर्कसंगत आणि योग्य वाटतो. पण आयुष्य ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. परिस्थिती बदलते , माणसं बदलतात , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली विचारसरणी बदलते. त्यामुळेच कालांतराने घेतलेले निर्णय नव्याने तपासून पाहावेसे वाटतात. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—विचारांचं पीक. एकदा का मनात एखादा विचार रुजला की तो वाढत जातो. त्याला खतपाणी मिळतं अनुभवांचं , तुलना करण्याचं , आणि ‘जर-तर’च्य...

कष्ट, सातत्य आणि समाधान—व्यवसायाची खरी कमाई

इमेज
  व्यवसाय आणि आपण स्वत: एक वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो , तर तो आपल्या अस्तित्वाचा , आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची मनापासून निवड करतो , जिच्यावर प्रेम करतो , त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्...

दु:खाची नवी ओळख

इमेज
  जीवन म्हणजे सुख-दुःखांची अखंड चालणारी साखळी. एका क्षणी आनंदाचा झरा वाहतो , तर दुसऱ्याच क्षणी दुःखाचे ढग दाटून येतात. मनुष्यस्वभाव असा आहे की , तो स्वतःच्या दुःखांमध्ये इतका गुंतून जातो की त्याला जगातील  वास्तव दिसेनासे होते. अशा वेळी “दुनिया में कितना ग़म है , मेरा ग़म कितना कम है” ही ओळ आपल्याला एक वेगळीच दृष्टी देऊन जाते. ही केवळ एक काव्यपंक्ती नाही , तर जीवन समजून घेण्याचा एक गूढ आणि गहन दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा आपल्या अडचणी , समस्या , अपयश , तणाव यांवर इतके लक्ष केंद्रित करतो की त्या आपल्याला असह्य वाटू लागतात. एखादी छोटीशी अडचण देखील पर्वताएवढी भासते. पण जर आपण थोडा वेळ थांबून आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिले , तर लक्षात येईल की अनेक लोक आपल्या पेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. कुणी दारिद्र्याशी झुंज देत आहे , कुणी आजाराशी लढत आहे , तर कुणी आपले प्रियजन गमावून जगण्याचा प्रयत्न करत आहे. या तुलनेत आपले दुःख खूपच लहान वाटू लागते. हीच गोष्ट आपल्याला अधिक संयमी आणि कृतज्ञ बनवते. कारण जेव्हा आपण इतरांच्या दुःखांकडे पाहतो , तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातील चां...