स्क्रीनमागील चेहरा: अभिव्यक्ती की असभ्यता?
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर केवळ संवादापुरता मर्यादित राहिलेला नाही ; तो व्यक्तिमत्त्व , विचारसरणी आणि संस्कारांचे प्रतिबिंब बनला आहे. प्रत्येक पोस्ट , प्रत्येक प्रतिक्रिया आणि विशेषतः केले जाणारे कमेन्टस् हे आपली मानसिकता आणि सामाजिक जाणीव स्पष्ट करतात. दुर्दैवाने , आज सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक कमेन्टस् या अशोभनीय , अपमानकारक आणि संवेदनशून्य असतात. यात आदर , समजूतदारपणा आणि संस्कारांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. “आदर”, म्हणजे काय रे भाऊ? तो कसा व्यक्त करावा हा कदाचित प्रशिक्षणाचा भाग असेल, पण तो करण्यास कुणी मेहरबान होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण एखाद्या व्यक्तीचा “आदर” करणे त्यास योग्य तो मान देणे ही एक भारतीय संस्कृती आहे. कदाचित सोशल मीडियाचा वापर करताना ही संस्कृती कुठे तरी लुप्त होत चालली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हे सारं आभासी जग आहे. कमेन्ट करताना अनेकजण हे विसरतात की समोरही एक माणूस आहे—भावना असलेला , विचार असलेला. स्क्रीनच्या आड लपल्यामुळे शब्दांची जबाबदारी कमी होते , असा गैरसमज तयार झाला आहे. परिणामी , टीका करताना मर्यादा ओलांडल्या जातात , वैयक्ति...