पोस्ट्स

आज वाचा

ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ?

इमेज
  ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ? सगळं खूप उथळ झालं आहे, समाजात , आता ऑनलाइन, आभासी समाजात असा उल्लेख करणं जास्त संयुक्तिक होईल, काही अपवाद वगळता, एखादी गोष्ट अचानक एवढी ट्रेंड होते की तुम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. अरे, काल,   नाही काही क्षणा पूर्वी ज्या व्यक्तीस / गोष्ट ओळखत नव्हतो, त्याचे नाव, काम, तो कोणत्या जातीचा, कसल्या विचारांचा आणि कोणत्या पक्षाचा याची पूर्ण कुंडलीच तयार झालेली असते. काही फायदे दिसतील याचे कदाचित, पण मला तर तोटेच जास्त दिसतात. पूर्वी दूरदर्शन सुरू होणेपूर्वी जी एक उत्सुकता असायची, बातम्यां साठी लक्ष दिले जायचे ते सारे आता इतिहास जमा झाले. कोणत्याही गोष्टी साठी थांबणे, वाट पाहणे हा पर्यायच आता उपलब्ध नाही. सगळं कस एकदम “तेज!, सबसे तेज !!”.           या साऱ्या गर्दीत जे चांगलं, पोषक आहे , उत्तम आहे त्याचा विसर पडतो आहे काय? असा प्रश्न मनात येतो. “जो जे वांछिल तो ते लाहो”, ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकातच सांगून ठेवलं आहे. पण जेंव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेंव्हा चुकीच्या म...

Gen Z: समस्या की नवी कार्यशक्ती?

इमेज
  आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पिढीची विचारसरणी , जीवनशैली आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा दिसून येतो. त्यात Gen Z ( १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली ) पिढी ही डिजिटल जगाशी सर्वाधिक जवळीक असलेली पिढी म्हणून ओळखली जाते. इंटरनेट , स्मार्टफोन , सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सान्निध्यात वाढलेल्या या तरुणांनी शिक्षणानंतर आता मोठ्या संख्येने व्यावसायिक जगात प्रवेश केला आहे. त्यांच्या कल्पकता , तंत्रज्ञानाचे ज्ञान , स्वावलंबी विचार आणि लवचिक कार्यपद्धतीमुळे कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे. मात्र , त्यांच्या कामाच्या पद्धती , अपेक्षा आणि कार्यसंस्कृती यांमुळे नियोक्त्यांसमोर काही नवी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे Gen Z आणि बदलती कार्यसंस्कृती हा आजच्या काळातील महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरत आहे. Gen Z सध्या विविध गोष्टीमुळे प्रकाशझोतात येत आहे. यातच विविध सर्वेक्षण देखील विविध संस्था करीत आहेत . शिक्षण आणि करिअर सल्लागार प्लॅटफॉर्म Intelligent.com च्या एका सर्वेक्षणानुसार , जवळपास सहापैकी एक नियोक्ता Gen Z कर्मचाऱ्या...

भारतातील उद्योजकता आणि Startup Culture: विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग

इमेज
  भारतात उद्योजकतेची गरज का आहे ? १८३५ मध्ये ब्रिटिश सरकारने इंग्लिश एज्युकेशन अॅक्टला मंजुरी दिल्यानंतर भारतातील शिक्षणव्यवस्थेवर ब्रिटिश दृष्टिकोनाचा प्रभाव वाढला . काळानुसार शिक्षणपद्धतीत अनेक बदल झाले , तरी नोकरीकेंद्रित विचारसरणीची काही मुळे आजही जाणवतात . मात्र आजचा भारत बदलत आहे . Startup India, डिजिटलायझेशन , तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यामुळे स्वतःचा उद्योग उभारण्याची संस्कृती हळूहळू रुजत आहे . भारत जगातील आघाडीच्या Startup Ecosystems पैकी एक बनला आहे . त्यामुळे नोकरी मिळवणे एवढाच career चा पर्याय न मानता समस्या ओळखणे , समाधान निर्माण करणे आणि त्यातून उद्योग उभारणे हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे . माझ्या मते , स्टार्टअप हा केवळ व्यवसायाचा प्रकार नाही ; तो आर्थिक स्वावलंबन , सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची विचारसरणी आहे . उद्योजकता ही एक संस्कृती का बनली पाहिजे ? स्वतःचा उद्योग उभारणे म्हणजे केवळ दुकान किंवा कंपनी सुरू करणे नव्हे . कल्पना करणे , नव्या ...