पोस्ट्स

आज वाचा

स्क्रीनमागील चेहरा: अभिव्यक्ती की असभ्यता?

इमेज
  आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर केवळ संवादापुरता मर्यादित राहिलेला नाही ; तो व्यक्तिमत्त्व , विचारसरणी आणि संस्कारांचे प्रतिबिंब बनला आहे. प्रत्येक पोस्ट , प्रत्येक प्रतिक्रिया आणि विशेषतः केले जाणारे कमेन्टस् हे आपली मानसिकता आणि सामाजिक जाणीव स्पष्ट करतात. दुर्दैवाने , आज सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक कमेन्टस् या अशोभनीय , अपमानकारक आणि संवेदनशून्य असतात. यात आदर , समजूतदारपणा आणि संस्कारांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. “आदर”, म्हणजे काय रे भाऊ? तो कसा व्यक्त करावा हा कदाचित प्रशिक्षणाचा भाग असेल, पण तो करण्यास कुणी मेहरबान होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण एखाद्या व्यक्तीचा “आदर” करणे त्यास योग्य तो मान देणे ही एक भारतीय संस्कृती आहे. कदाचित सोशल मीडियाचा वापर करताना ही संस्कृती कुठे तरी लुप्त होत चालली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हे सारं आभासी जग आहे. कमेन्ट करताना अनेकजण हे विसरतात की समोरही एक माणूस आहे—भावना असलेला , विचार असलेला. स्क्रीनच्या आड लपल्यामुळे शब्दांची जबाबदारी कमी होते , असा गैरसमज तयार झाला आहे. परिणामी , टीका करताना मर्यादा ओलांडल्या जातात , वैयक्ति...

पण, परंतु .. आणि निर्णय

इमेज
  अनेकदा आयुष्यात काही निर्णय आपण त्या क्षणाच्या उपलब्ध साधनांवर , परिस्थितीवर आणि आपल्या समजुतींवर घेतो. त्या वेळी ते निर्णय अगदी योग्य वाटतात. पण काळ पुढे सरकतो , अनुभव वाढतात , आणि मग मागे वळून पाहताना काही प्रश्न मनात ठाण मांडून बसतात—“तो निर्णय योग्य होता का ?”, “ मी वेगळी वाट निवडली असती तर काय झालं असतं ?” अशा प्रश्नांचं ओझं हळूहळू मनावर साचतं आणि एक प्रकारचं ‘शल्य’ मनात निर्माण होतं. खरं तर निर्णय घेताना आपण त्या काळात ‘प्राप्त’ आणि ‘पर्याप्त’ अशा गोष्टींचा विचार करतो. जे मिळालं आहे आणि जे पुरेसं वाटतंय , त्याच्या आधारे आपण पुढे जाण्याचा मार्ग ठरवतो. त्या क्षणी तो निर्णय पूर्णपणे तर्कसंगत आणि योग्य वाटतो. पण आयुष्य ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. परिस्थिती बदलते , माणसं बदलतात , आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली विचारसरणी बदलते. त्यामुळेच कालांतराने घेतलेले निर्णय नव्याने तपासून पाहावेसे वाटतात. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—विचारांचं पीक. एकदा का मनात एखादा विचार रुजला की तो वाढत जातो. त्याला खतपाणी मिळतं अनुभवांचं , तुलना करण्याचं , आणि ‘जर-तर’च्य...

कष्ट, सातत्य आणि समाधान—व्यवसायाची खरी कमाई

इमेज
  व्यवसाय आणि आपण स्वत: एक वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो , तर तो आपल्या अस्तित्वाचा , आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची मनापासून निवड करतो , जिच्यावर प्रेम करतो , त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्...

दु:खाची नवी ओळख

इमेज
  जीवन म्हणजे सुख-दुःखांची अखंड चालणारी साखळी. एका क्षणी आनंदाचा झरा वाहतो , तर दुसऱ्याच क्षणी दुःखाचे ढग दाटून येतात. मनुष्यस्वभाव असा आहे की , तो स्वतःच्या दुःखांमध्ये इतका गुंतून जातो की त्याला जगातील  वास्तव दिसेनासे होते. अशा वेळी “दुनिया में कितना ग़म है , मेरा ग़म कितना कम है” ही ओळ आपल्याला एक वेगळीच दृष्टी देऊन जाते. ही केवळ एक काव्यपंक्ती नाही , तर जीवन समजून घेण्याचा एक गूढ आणि गहन दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा आपल्या अडचणी , समस्या , अपयश , तणाव यांवर इतके लक्ष केंद्रित करतो की त्या आपल्याला असह्य वाटू लागतात. एखादी छोटीशी अडचण देखील पर्वताएवढी भासते. पण जर आपण थोडा वेळ थांबून आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिले , तर लक्षात येईल की अनेक लोक आपल्या पेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. कुणी दारिद्र्याशी झुंज देत आहे , कुणी आजाराशी लढत आहे , तर कुणी आपले प्रियजन गमावून जगण्याचा प्रयत्न करत आहे. या तुलनेत आपले दुःख खूपच लहान वाटू लागते. हीच गोष्ट आपल्याला अधिक संयमी आणि कृतज्ञ बनवते. कारण जेव्हा आपण इतरांच्या दुःखांकडे पाहतो , तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातील चां...

"बाबा" नावाचं आभाळ… आणि अपूर्ण राहिलेली एक प्रार्थना

इमेज
  ‘ तुज मागतो मी आता’ या प्रार्थनेतून उमटलेली वेदना २०११ च्या एप्रिल महिन्यापासून माझ्या मोबाईलचा रिंगटोन एकच होता — “तुज मागतो मी आता” हे भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं गणेशस्तवन, त्या सुरांमध्ये एक आर्तता आहे , एक शरणागत भाव आहे , आणि एक विश्वासही — की आपण जे काही मागू , ते बाप्पा ऐकेल. त्यावेळी जे काही मनोमन मागत होतो , ते गणरायाने दिलं नाही , ही भावना मात्र मनात घर करून बसली. पण खरी कसोटी तेव्हा लागली , जेव्हा बाबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूच्या बाहेर उभं राहून मशीनचे आवाज ऐकणं , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून अंदाज बांधणं , आणि प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या दोलायमान अवस्थेत काढणं — हे सगळं आयुष्य बदलून टाकणारं होतं. “बाबा” व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या छातीतून येणारा श्वास हा त्यांच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा नव्हता , तर एका मशीनच्या सहाय्याने चाललेला होता. त्या अवस्थेत मनात एकच मागणं होतं — “बाप्पा , बाबांना लवकर बरं कर. यातून बाहेर काढ.” ही प्रार्थना नव्हती , ही विनवणी होती ; किंबहुना आर्त हाक होती. १० मे २०११ रोजी मी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती येथे दर्शना...

विद्या कॉम्प्युटर्स: २६ वर्षांचा विश्वास, ज्ञानसाधना आणि Ai Ready Career Institute ची यशोगाथा

इमेज
आणखी एक वर्ष ! वर्षाचे ३६५ दिवस पूर्ण करून नवा दिवस ! नवी ऊर्जा, नवा उत्साह, नव्या कल्पनांसह , नव्या तंत्रज्ञानाचे दीप हाती घेऊन पुढील ज्ञानपर्वाच्या वाटेवर मार्गस्थ होणे, नक्कीच अभिमानास्पद आहे, वाढलेली जबाबदारी खूप मोठी आहे. अर्थात याचे भान आम्हाला आहे. जुळे सोलापूर परिसरात ८० चौ. फुटा पासून सुरू झालेला प्रवास आज २००० चौ फुटात दिमाखात सुरू आहे. विद्या कॉम्प्युटर्स २६ वर्षांचं झालं !  तसं पाहिलं तर खूप मोठा पल्ला, ९४९० दिवस, १ लाखा पेक्षा जास्त सोलापूरकरांच्या हृदयात स्थान मिळविणं हे आमचं सर्वात मोठं यश मानतो आम्ही.  सोलापूरकरांच्या मनो विश्वात आशा, विचार आणि नव चैतन्याचा प्रकाश पेरण्याचे पवित्र कार्य आम्ही केले , करीत आहोत. सोलापूरकरांचा आशीर्वाद असाच सोबत करेल याची काडीमात्र शंका आमच्या मनात नाही आणि त्याच बळावर आम्ही आमची वाटचाल अशीच सुरू ठेवू. आयुष्यातील महत्वाची वर्षं या वाटचालीत उपयोगात आणली गेली. पदव्युत्तर शिक्षण झालेले असताना देखील सोलापूर शहर न सोडता, येथेच राहून संगणक शिक्षण, स्किल प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान...

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

इमेज
  “ सोलापूर” हे नाव उच्चारताच मनात अनेक परिचयाच्या गोष्टी उजळून निघतात—टेक्सटाइल उद्योगाचे भक्कम केंद्र , हुतात्म्यांच्या त्यागाने पावन झालेली भूमी , श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाछायेत न्हालेली नगरी आणि महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात वेगाने पुढे येणारे शहर. या सर्व ओळखींसोबतच , मागील दोन दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात सोलापुरात घडलेले परिवर्तन विशेषत्वाने नोंद घ्यावे असे आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांतून आकारास आलेले स्वतंत्र विद्यापीठ , नव्याने उभारलेली तंत्रमहाविद्यालये , तसेच खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून विस्तारलेले उच्च शिक्षणाचे दालन—या सर्वांनी मिळून सोलापूरला शिक्षणसमृद्ध शहराची नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. साक्षरतेच्या आकडेवारीत सातत्याने दिसणारी वाढ आणि अनेक महाविद्यालयांना प्राप्त झालेला “स्वायत्त” दर्जा हा या प्रगतीचा ठोस पुरावा आहे. एक सोलापूरकर म्हणून हा प्रवास अभिमानाने उर भरून येईल असा आहे. याच शैक्षणिक प्रवासाला पूरक ठरत , शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त , मॉड्युलर स्वरूपातील अभ्या...