तेरे बिना जिंदगी से - भावनांचा संयत आविष्कार
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोन जीव, नेहमीप्रमाणे (टिपिकल बॉलीवुड स्टाइल) वडिलांचा विरोध, कारण काय तर वडील राजकारणातील मात्तबर व्यक्ति. पक्षात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण ! अशा परिस्थिती मध्ये मुलगी बंड करते आणि त्या सामान्य व्यक्ति ज्याच्यावर तिचे जिवापाड प्रेम असतं त्याच्या सोबत लग्न करते. अर्थात लग्नानंतर वडील मुलीच्या संपर्कात राहतात आणि तिला राजकारणात घेऊन जाण्यात यशस्वी होतात. समाजसेवा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यात आणि राजकारण या पाशात मुलगी पुरती अडकून जाते, दोन जीव वेगळे होतात. योगा –योगाने साधारण नऊ वर्षाने एका हॉटेल मध्ये दोघे पुन्हा भेटतात ! आणि त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो. एव्हाना तुम्हाला चित्रपटाचे नाव लक्षात आलं असेल. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, “आंधी”, याच चित्रपटाची कथा आहे ही. मुलीचे कर्तव्य, पक्षाचे स्वामित्व हे दोन्ही एका पारड्यात आणि नवरा, घर दुसऱ्या पारड्यात, अर्थात कथेत अभिनेत्रीचे पारडे पक्ष आणि राजकारण याकडे झुकलेलं दाखविण्यात आले आहे. कुणासही त्याच्या आयुष्यात, त्याने ज्...