पोस्ट्स

आज वाचा

सावरकरांविषयी बोलण्याआधी सावरकर वाचा

इमेज
  सावरकर या नावाचे भारतीय इतिहासात एक वेगळे स्थान आहे. भारताचा इतिहास सावरकरां शिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही. सावरकरांविषयी अनेकांना कुतूहल असतं, कुणी ते मान्य करतं कुणी ते नाही स्वीकारत, ज्याचा त्याचा प्रश्न पण सोशल मीडिया, इलेक्ट्रोनिक मीडिया वर सावरकरां विषयी निरर्थक कमेन्ट केली की ट्रेंड होतं हे नक्की ! प्रसिद्धी मिळते असे काही बालबुद्धी मानतात आणि तसे वागतात सुद्धा. देव त्यांचे भले करो. पण हे नक्की असतं की या सर्व बालबुद्धींनी सावरकर वाचलेले नसतात. सावरकर कोण आहेत याचा थोडाही अभ्यास या लोकांनी केलेला नसतो. फक्त कानोपकानी गोष्टी पसरविणे आणि चिखलफेक करणे एवढाच काय तो यांचा अजेंडा असतो.             सावरकर कुण्या सोम्या- गोम्याला समजत नाही एवढं मात्र नक्की. कारण या सोम्या- गोम्यांच्या बुद्धीची तेवढी क्षमताच नसते. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते, विज्ञानवादी सावरकर, साहित्य प्रभू सावरकर, महाकवी सावरकर, समाजसुधारक सावरकर, क्रांतिवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, पत्रकार, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाषा शुद्...

वाणीची जादू- संवादातून जिंकली मनं

इमेज
  माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे , असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु समाजात राहण्यासाठी केवळ ज्ञान , पदवी किंवा संपत्ती पुरेशी नसते ; माणसाला माणसांशी जोडून ठेवणारा जो अदृश्य धागा असतो , तो आहे – संवाद . विचार , भावना , अनुभव आणि अपेक्षा यांची देवाणघेवाण करण्याची कला म्हणजे संवाद. आणि ही कला जितकी प्रभावी , तितके व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि यशस्वी बनते. संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो. योग्य शब्दांची निवड , ऐकण्याची क्षमता , चेहऱ्यावरील भाव , शरीरभाषा (देहबोली) आणि समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर यांचा समन्वय म्हणजे प्रभावी संवाद. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे ज्ञान अफाट असते , पण ते योग्य पद्धतीने मांडता येत नसल्याने त्याला अपेक्षित यश मिळत नाही. उलट काही व्यक्ती आपल्या प्रभावी संवाद शैलीमुळे लोकांच्या मनात सहज स्थान निर्माण करतात.             व्यवसाय करीत असताना संवाद कौशल्य महत्वाचेच आहे. तुमचा व्यवसाय तुम्हाला घडवतो, शिकवतो, व्यवसायात तुमचे समर्पण असायला हवे ही एकच अट यामागे असते. ज्याच्याकडे हे समर्पण असतं...

सावरकर - राष्ट्र तपस्वी

इमेज
  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की , त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद , दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष , त्याग , राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही.   सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते , तर ते क्रांतिकारक , साहित्यिक - ( भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा ), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी ...

घुटमळलेलं मन

इमेज
            सकाळीच आठवणं झाली , तशी या साठी काही विशेष दिवस असे काही लागत नाही. साऱ्या गोष्टी डोळ्या समोर सहज तरळून जातात. सिनेमाच्या पडद्यावर जशा फ्लॅशबॅक स्वरूपात दाखवल्या जातात ना अगदी तशाच ! सारं काही कालच घडलं असं वाटतं, आपण हतबल होऊन फक्त वाट पाहत होतो पण नियतीला तिचा डाव साध्य करायचा होता तो तिने केला. मेंदूतील रक्तस्त्राव पूर्ण क्लिअर करणं खूप जटिल प्रक्रिया, त्यात झालेला रक्तस्त्राव क्लीन करे पर्यन्त नुकसान झालेल्या पेशी , त्यामुळे होणारे इतर परिणाम हे सारं खूप गुंतागुंतीच आहे. तरी सकाळी ऑपेरिटीव पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “खूप सहन केलं त्यांनी”, एक डॉक्टर हे म्हणतो याचा अर्थ त्या ऑपेरेटीवने होणाऱ्या वेदनांचा अंदाज त्यांना असतोच. एवढ्या वेदना सहन केल्या पण शुद्ध काही आली नाही.             तो निर्जीव पांढराशुभ्र हॉस्पिटलचा कॉरिडॉर , औषधांचा उग्र वास , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर शांतत्व आणि आतून सतत धडधडणारं मन — आजही सगळं तितकंच जिवंत वाटतं. आपण बाहेर उभे , पूर्ण हतबल. हातात काहीच...

राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण

इमेज
  राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण भारतभूमीचे आराध्य दैवत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणे म्हणजे त्यांच्या अद्वितीय पराक्रम , धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला अर्पण केलेली एक भावपूर्ण आदरांजली होय. आज पर्यन्त अनेक चित्रपट निर्मात्यानी असा प्रयत्न केला आहे. यासाठी विविध ऐतिहासिक दस्त ऐवज वापरुन आपल्या राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर चितारला आहे. १ मे रोजी रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित झाला. तसा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता पण संध्याकाळचे तिकीट मिळालं, पण ठरविल्या प्रमाणे फर्स्ट डे पाहिला. तसा हा चित्रपट तयार होण्यास दहा वर्षाचा काळ लागला, आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बिग बजेट चित्रपट ! मेगा स्टार कास्ट, भव्य सेट आणि सोबतीला कॉम्प्युटर ग्राफिक्स ! तंत्रज्ञान फार पुढे गेलं आहे, क्रोमा ग्रीनचा वापर केला की संगणकावर सारं कसं सहज साध्य होतं. चित्रपटात महाराजांचे विविध पैलू समोर येतात, महाराजांना पडद्यावर साकारण्याचे धनुष्य पेलण्याचा रितेशने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रितेश आणि त्याचे वडील यांच्यातील नाते संपूर्ण महाराष्ट्रास ...

ब्लॉग मध्ये सामावलेली समृद्धता

इमेज
  आज अनेक दिवसांनंतर ब्लॉगच्या Admin Console ला भेट दिली आणि लक्षात आलं की माझ्या ब्लॉगवर एकूण १९५ लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल म्हणतो खरे पण आपण आजवर या एवढ्या मोठ्या समूहास काय दिलं? तर अनुभव आणि ज्ञान याच्या जोरावर हे लेख ! जे कदाचित कुणासाठी प्रेरणा देऊ करतील, कुणासाठी माहितीचा खजिना म्हणून ज्ञान देऊ करतील. ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे, या देण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे. स्वत:चे कौतुक म्हणून नाही पण वाचन तुम्हाला विचाराने समृद्ध करतं, नवी दिशा देतं आणि प्रेरणाही देतं, ब्लॉगला भेट दिल्यास तुम्हास देखील याची प्रचिती येऊ शकेल. “ समृद्ध ” होणं या पेक्षा काही वेगळं असेल असे नाही वाटत. समृद्धता ही केवळ संपत्ती , वैभव किंवा भौतिक सुखसुविधांची बेरीज नसून , ती जीवनाच्या व्यापक आणि सूक्ष्म पैलूंना स्पर्श करणारी संकल्पना आहे, असे मी मानतो.   ब्लॉगवरील हे लेख कुण्या एकाच विषयावर नाहीत तर त्यात बॉलीवुड, सुलेखन, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, प्रासंगिक, माहितीपर, करिअर विषयक, व्यावसायिक मार्गदर्शन, स्टार्टअप, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान विषयक, मनोगत अ...

तेरे बिना जिंदगी से - भावनांचा संयत आविष्कार

इमेज
  एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोन जीव, नेहमीप्रमाणे (टिपिकल बॉलीवुड स्टाइल) वडिलांचा विरोध, कारण काय तर वडील राजकारणातील मात्तबर व्यक्ति. पक्षात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण ! अशा परिस्थिती मध्ये मुलगी बंड करते आणि त्या सामान्य व्यक्ति ज्याच्यावर तिचे जिवापाड प्रेम असतं त्याच्या सोबत लग्न करते. अर्थात लग्नानंतर वडील मुलीच्या संपर्कात राहतात आणि तिला राजकारणात घेऊन जाण्यात यशस्वी होतात. समाजसेवा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यात आणि राजकारण या पाशात मुलगी पुरती अडकून जाते, दोन जीव वेगळे होतात. योगा –योगाने साधारण नऊ वर्षाने एका हॉटेल मध्ये दोघे पुन्हा भेटतात ! आणि त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो. एव्हाना तुम्हाला चित्रपटाचे नाव लक्षात आलं असेल. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, “आंधी”, याच चित्रपटाची कथा आहे ही. मुलीचे कर्तव्य, पक्षाचे स्वामित्व हे दोन्ही एका पारड्यात आणि नवरा, घर दुसऱ्या   पारड्यात, अर्थात कथेत अभिनेत्रीचे पारडे पक्ष आणि राजकारण याकडे झुकलेलं दाखविण्यात आले आहे.             कुणासही त्याच्या आयुष्यात, त्याने ज्...