पोस्ट्स

आज वाचा

मेरा रंग दे बसंती चोला

इमेज
मेरा रंग दे बसंती चोला, हे गीत कायम प्रेरणास्त्रोत आहे, कधीही गावे/ऐकावे आपल्या समोर भगतसिंग आलेच पाहिजेत, हे गीत आपणही अनेकदा ऐकले असावे. प्रत्येक गीतकाराने मातृभूमी प्रती त्याच्या भावना प्रकट करीत असताना नकळत आपल्या भावनांना देखील स्पर्श केला आहे. मातृभूमी प्रती समर्पण भाव या गीतातून व्यक्त होतो असे मला वाटते. मातृभूमी प्रती समर्पित भाव जागवण्याचे प्रेरणादायी गीत !! हे गीत हिंदी चित्रपट सृष्टीत अनेकदा लिहिले गेले आणि त्यास संगीत दिले गेले. मग ते प्रेम धवन (शहीद- मनोजकुमार अभिनित शहीद) असतील, समीर (द लीजंड ऑफ भगतसिंग- अजय देवगण अभिनित) असेल अथवा देव कोहली (२३ मार्च १९३१ शहीद - बॉबी देवोल अभिनित) असतील, या सर्वांनी मेरा रंग दे बसंती चोला या गीतास त्यांच्यापरीने न्याय देण्याचे काम केले आहे. प्रत्येक संगीतकाराने देखील तेवढीच त्याची काळजी घेतली आहे. आणि प्रत्येक वेळी उत्कट असे गीत आपल्यापर्यंत पोहोचले. पण मेरा रंग दे बसंती हे गीत सर्व प्रथम लिहिले राम प्रसाद बिस्मिल यांनी, आता हे, राम प्रसाद बिस्मिल कोण? तर लखनऊ च्या तुरुंगात काकोडी कारस्थानात अटक केलेले स्वातंत्र्यसैनिक होते. वसंत पंचम...

कष्ट, सातत्य आणि समाधान—व्यवसायाची खरी कमाई

इमेज
  व्यवसाय आणि आपण स्वत: एक वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो , तर तो आपल्या अस्तित्वाचा , आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची मनापासून निवड करतो , जिच्यावर प्रेम करतो , त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्...

दु:खाची नवी ओळख

इमेज
  जीवन म्हणजे सुख-दुःखांची अखंड चालणारी साखळी. एका क्षणी आनंदाचा झरा वाहतो , तर दुसऱ्याच क्षणी दुःखाचे ढग दाटून येतात. मनुष्यस्वभाव असा आहे की , तो स्वतःच्या दुःखांमध्ये इतका गुंतून जातो की त्याला जगातील  वास्तव दिसेनासे होते. अशा वेळी “दुनिया में कितना ग़म है , मेरा ग़म कितना कम है” ही ओळ आपल्याला एक वेगळीच दृष्टी देऊन जाते. ही केवळ एक काव्यपंक्ती नाही , तर जीवन समजून घेण्याचा एक गूढ आणि गहन दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा आपल्या अडचणी , समस्या , अपयश , तणाव यांवर इतके लक्ष केंद्रित करतो की त्या आपल्याला असह्य वाटू लागतात. एखादी छोटीशी अडचण देखील पर्वताएवढी भासते. पण जर आपण थोडा वेळ थांबून आपल्या सभोवतालच्या जगाकडे पाहिले , तर लक्षात येईल की अनेक लोक आपल्या पेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. कुणी दारिद्र्याशी झुंज देत आहे , कुणी आजाराशी लढत आहे , तर कुणी आपले प्रियजन गमावून जगण्याचा प्रयत्न करत आहे. या तुलनेत आपले दुःख खूपच लहान वाटू लागते. हीच गोष्ट आपल्याला अधिक संयमी आणि कृतज्ञ बनवते. कारण जेव्हा आपण इतरांच्या दुःखांकडे पाहतो , तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातील चां...

"बाबा" नावाचं आभाळ… आणि अपूर्ण राहिलेली एक प्रार्थना

इमेज
  ‘ तुज मागतो मी आता’ या प्रार्थनेतून उमटलेली वेदना २०११ च्या एप्रिल महिन्यापासून माझ्या मोबाईलचा रिंगटोन एकच होता — “तुज मागतो मी आता” हे भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं गणेशस्तवन, त्या सुरांमध्ये एक आर्तता आहे , एक शरणागत भाव आहे , आणि एक विश्वासही — की आपण जे काही मागू , ते बाप्पा ऐकेल. त्यावेळी जे काही मनोमन मागत होतो , ते गणरायाने दिलं नाही , ही भावना मात्र मनात घर करून बसली. पण खरी कसोटी तेव्हा लागली , जेव्हा बाबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूच्या बाहेर उभं राहून मशीनचे आवाज ऐकणं , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून अंदाज बांधणं , आणि प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या दोलायमान अवस्थेत काढणं — हे सगळं आयुष्य बदलून टाकणारं होतं. “बाबा” व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या छातीतून येणारा श्वास हा त्यांच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा नव्हता , तर एका मशीनच्या सहाय्याने चाललेला होता. त्या अवस्थेत मनात एकच मागणं होतं — “बाप्पा , बाबांना लवकर बरं कर. यातून बाहेर काढ.” ही प्रार्थना नव्हती , ही विनवणी होती ; किंबहुना आर्त हाक होती. १० मे २०११ रोजी मी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती येथे दर्शना...

विद्या कॉम्प्युटर्स: २६ वर्षांचा विश्वास, ज्ञानसाधना आणि Ai Ready Career Institute ची यशोगाथा

इमेज
आणखी एक वर्ष ! वर्षाचे ३६५ दिवस पूर्ण करून नवा दिवस ! नवी ऊर्जा, नवा उत्साह, नव्या कल्पनांसह , नव्या तंत्रज्ञानाचे दीप हाती घेऊन पुढील ज्ञानपर्वाच्या वाटेवर मार्गस्थ होणे, नक्कीच अभिमानास्पद आहे, वाढलेली जबाबदारी खूप मोठी आहे. अर्थात याचे भान आम्हाला आहे. जुळे सोलापूर परिसरात ८० चौ. फुटा पासून सुरू झालेला प्रवास आज २००० चौ फुटात दिमाखात सुरू आहे. विद्या कॉम्प्युटर्स २६ वर्षांचं झालं !  तसं पाहिलं तर खूप मोठा पल्ला, ९४९० दिवस, १ लाखा पेक्षा जास्त सोलापूरकरांच्या हृदयात स्थान मिळविणं हे आमचं सर्वात मोठं यश मानतो आम्ही.  सोलापूरकरांच्या मनो विश्वात आशा, विचार आणि नव चैतन्याचा प्रकाश पेरण्याचे पवित्र कार्य आम्ही केले , करीत आहोत. सोलापूरकरांचा आशीर्वाद असाच सोबत करेल याची काडीमात्र शंका आमच्या मनात नाही आणि त्याच बळावर आम्ही आमची वाटचाल अशीच सुरू ठेवू. आयुष्यातील महत्वाची वर्षं या वाटचालीत उपयोगात आणली गेली. पदव्युत्तर शिक्षण झालेले असताना देखील सोलापूर शहर न सोडता, येथेच राहून संगणक शिक्षण, स्किल प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान...

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

इमेज
  “ सोलापूर” हे नाव उच्चारताच मनात अनेक परिचयाच्या गोष्टी उजळून निघतात—टेक्सटाइल उद्योगाचे भक्कम केंद्र , हुतात्म्यांच्या त्यागाने पावन झालेली भूमी , श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाछायेत न्हालेली नगरी आणि महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात वेगाने पुढे येणारे शहर. या सर्व ओळखींसोबतच , मागील दोन दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात सोलापुरात घडलेले परिवर्तन विशेषत्वाने नोंद घ्यावे असे आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांतून आकारास आलेले स्वतंत्र विद्यापीठ , नव्याने उभारलेली तंत्रमहाविद्यालये , तसेच खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून विस्तारलेले उच्च शिक्षणाचे दालन—या सर्वांनी मिळून सोलापूरला शिक्षणसमृद्ध शहराची नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. साक्षरतेच्या आकडेवारीत सातत्याने दिसणारी वाढ आणि अनेक महाविद्यालयांना प्राप्त झालेला “स्वायत्त” दर्जा हा या प्रगतीचा ठोस पुरावा आहे. एक सोलापूरकर म्हणून हा प्रवास अभिमानाने उर भरून येईल असा आहे. याच शैक्षणिक प्रवासाला पूरक ठरत , शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त , मॉड्युलर स्वरूपातील अभ्या...

पहिली शस्त्रक्रिया : भीती, धाडस आणि शरीराशी झालेला नवा संवाद

इमेज
  हृदयाची वाढणारी धडधड, काळजी आणि पुढे काय आणि कसे होणार? हा अनुत्तरित प्रश्न ! अर्थात उत्तर लागलीच मिळणारच होतं पण मिळेपर्यंत सोबत करणारी एक अनामिक भिती ! हो भीतीच, कारण आयुष्यात प्रथमच एखाद्या ऑपरेशनला सामोरे जात होतो. हॉस्पिटल मध्ये सोबत करणे ठिक असतं,पण ऑपरेटीव प्रोसीजर स्वत:च पाहणे आणि त्यात सामील होणे हे प्रथमच ! त्यामुळे नाही म्हंटल तरी टेंशन आलेलच होतं. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर देखील थोडं वाढलं. ऑपरेशन हा शब्दच मुळी धाडस दर्शवितो, मग ते सैन्य दलात असेल, अथवा हॉस्पिटल ! फार काही नाही पण “धाडस” या शब्दाचा मला चांगला समजलेला अर्थ असा की भिती असतानाही धोक्याचा सामना करण्याची मानसिक ताकद. डॉक्टरांवर विश्वास ठेवला की फार काही धाडस करण्याची गरज नसते पण मनुष्य प्राणी सहजा सहजी असे काही करत नाही, तसा तुम्हालाही अनुभव असावाच !           सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की फार काही “सीरियस” असे घडले नाही, फक्त मी हे प्रथमच फेस केलं म्हणून त्याचं अप्रूप ! बाकी अशा अनेक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात आणि रुग्ण हसत हसतं घरी देखील जातात. मी देखील...

भारत विरुद्ध इंडिया : शिक्षण, एआय आणि हरवलेली दिशा

इमेज
  शहर आणि गांव / खेड यांच्यातील संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये एक मोठी दरी दिसतेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण ! यात देखील एक मोठी दरी पहायला मिळते. भारत आणि इंडिया यातील दरी सतत वाढणारी राहील असे चित्र आजतरी दिसतं आहे. डिजिटल क्रांती भारतात (गावात) आली नाही असे नाही पण अद्याप भारत इंडियाशी जोडलेला नाही हे त्रिवार सत्य आहे.  आता हेच पहा, शिक्षणांवर सर्वांचाच सारखाच अधिकार आहे, पण या भावी पिढीस आपण शिक्षित करीत आहोत की साक्षर ? की दोन्हीही नाही. शिक्षण क्षेत्रात वावरत असताना अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे मुलांना धड वाचताही येत नाही. लिहिणं तर खूप दूरची गोष्ट ! तुम्ही म्हणाल, काहीतरी सांगताय पण ही वस्तुस्थिती आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणारे आहेत हे नमूद करणे अनिवार्य आहे. ही मित्र मंडळी उत्तीर्ण कशी झाली? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कितीही कॉपी मुक्त अभियान चालविले तरी नैतिकता कशाशी खातात हे जो पर्यन्त समजणार, शिकणार नाही तो पर्यन्त काहीही फरक पडणार नाही. असे विद्यार्थी त्यांचं शालेय शिक्षण संपवून जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा या स्पर्धेच्या युगात ही मित...