“निष्ठा” म्हणजे काय रे भाऊ ?
“ पक्ष सोडू शकता , पण विचार कसा सोडणार ?” हा प्रश्न आता भूतकाळात जमा झाला आहे. आज सकाळी एका पक्षाच्या विचारसरणीवर जीव ओवाळून टाकणारा नेता संध्याकाळी थेट विरोधी विचारसरणीच्या मंचावर गळ्यात उपरणं टाकून बसलेला दिसतो. त्यामुळे ‘निष्ठा’ नेमकी कशाशी असावी , हा प्रश्न आजच्या मतदाराला पडला आहे. ती पक्षाच्या चिन्हाशी हवी , पक्षाच्या नेत्याशी हवी , की पक्षाच्या ध्येय-धोरणांशी ? सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं तर उत्तर स्पष्ट मिळतं—नेत्यांची निष्ठा पक्षाशीही नाही , चिन्हाशीही नाही आणि जनतेशी तर अजिबात नाही. त्यांची निष्ठा आहे ती फक्त आणि फक्त सत्ता , संपत्ती आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी! मतदार हा गृहितच धरला गेला आहे आज पर्यन्त ! पक्षाची नीतीमूल्ये आणि ध्येय-धोरणे या पुस्तकात लिहायच्या गोष्टी उरल्या आहेत . आजच्या राजकारणात ‘विचारसरणी’ ( Ideology) हा शब्द फक्त निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना खेळवण्यापुरता वापरला जातो. सत्तेची समीकरणं जुळवायची वेळ येते , तेव्हा सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी ठरतात. हा खेळ पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडतो, सामान्य जनता काय पाहून मतदान करते ? पण विचार...