पोस्ट्स

आज वाचा

“निष्ठा” म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
  “ पक्ष सोडू शकता , पण विचार कसा सोडणार ?” हा प्रश्न आता भूतकाळात जमा झाला आहे. आज सकाळी एका पक्षाच्या विचारसरणीवर जीव ओवाळून टाकणारा नेता संध्याकाळी थेट विरोधी विचारसरणीच्या मंचावर गळ्यात उपरणं टाकून बसलेला दिसतो. त्यामुळे ‘निष्ठा’ नेमकी कशाशी असावी , हा प्रश्न आजच्या मतदाराला पडला आहे. ती पक्षाच्या चिन्हाशी हवी , पक्षाच्या नेत्याशी हवी , की पक्षाच्या ध्येय-धोरणांशी ? सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं तर उत्तर स्पष्ट मिळतं—नेत्यांची निष्ठा पक्षाशीही नाही , चिन्हाशीही नाही आणि जनतेशी तर अजिबात नाही. त्यांची निष्ठा आहे ती फक्त आणि फक्त सत्ता , संपत्ती आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी! मतदार हा गृहितच धरला गेला आहे आज पर्यन्त ! पक्षाची नीतीमूल्ये आणि ध्येय-धोरणे या पुस्तकात लिहायच्या गोष्टी उरल्या आहेत . आजच्या राजकारणात ‘विचारसरणी’ ( Ideology) हा शब्द फक्त निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना खेळवण्यापुरता वापरला जातो. सत्तेची समीकरणं जुळवायची वेळ येते , तेव्हा सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी ठरतात. हा खेळ पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडतो, सामान्य जनता काय पाहून मतदान करते ?   पण विचार...

सोलापूर की पुणे? पूर्वग्रहांचा सुस्कारा आणि वास्तवाचा आवाज

इमेज
  नुकताच एका पुणे स्थित कंपनीतील अधिकारी वर्गाशी मार्गदर्शन सेशन विषयी संवाद झाला. त्यांनी मला तुम्ही कोठे असता ? पुणे की सोलापूर - मी उत्तर दिलं सोलापूर – एक दोन दिवसांत संपर्क करू / ऑनलाइन कॉल घेऊ हे सांगायच्या अगोदर त्यांनी सोडलेल्या सुस्काराने (श्वासाने) मला उत्तर मिळालं, घडलही अगदी तसेच, ना फोन आला ना ऑनलाइन कॉल विषयी डिटेल्स ! असा अनुभव काही मला एकट्यालाच आला असेल असे नाही, अनेकांना आला असावा पण असे वाटते की प्रतिभा, ज्ञान, अनुभव फक्त मेट्रो सिटी मध्येच असतो का? सोलापूर सारख्या शहरात हे सारं नाही का? सोलापूर विषयी एवढी नकरात्मकता का ? उपहास का ? अनुभवातून उमटलेला प्रश्न हा केवळ एका संवादापुरता मर्यादित नाही , तर तो आपल्या समाजात शहरांबद्दल निर्माण झालेल्या प्रतिमा , पूर्वग्रह आणि “स्टेटस सिम्बॉल” मानसिकतेशी जोडलेला आहे. “पुणे की सोलापूर ?” या साध्या प्रश्नाला मिळालेला सुस्कारा आणि त्यामागची सूक्ष्म प्रतिक्रिया ही अनेकदा शब्दांपेक्षा जास्त काही सांगून जाते. सोलापूरबद्दल दिसणारी नकारात्मकता ही प्रत्यक्ष वास्तवापेक्षा लोकांच्या मनात तयार झालेल्या प्रतिमांवर आधारित असते , असे म...

सोलापूर आणि आयटी पार्क : तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेचा अंत कधी?

इमेज
  सोलापूर आणि आय टी पार्क – एक हास्यास्पद समीकरण होईल की काय अशी भिती आता वाटते आहे. सरकार कुणाचंही असो सोलापूरकरांच्या पदरात फक्त निराशाच पडते. असा अनुभव याही वेळी येईल अशीच शक्यता दिसते आहे. वृत्तपत्रांतून रोज नव्या अडचणी समोर येतात पण त्यावर तोडगा काढणारा “धुरंधर” काही सोलापूरकरांच्या वाट्याला येत नाही, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. निवडणुकां पुरते आणि त्या नंतर काही दिवस चर्चेत राहणारे विषय अशा प्रकारे हाताळण्यात येतात की अवघं सोलापूर नवी स्वप्नं रंगवू लागतं, पण सामान्य सोलापूरकरांच्या हाती काहीच लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो हे काही सोलापूरकरांना नवीन नाही पण विमान सेवा, आय टी पार्क आणि नवे सुविधा युक्त एमआयडीसी, नवे उद्योग सुरू होणे कठीणच आहे. यासाठी आता सामान्य जनतेस रस्त्यावर उतरावं लागेल काय?  आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी अवश्य पहावी.           १९९० च्या दशकात शिक्षण घेत असलेली आमची पिढी ही संगणक आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या टप्प्याची साक्षीदार आहे. १९९७–९८ च्या सुमारास सोलापुरात आयटी पार्क सुरू होणार असल्या...

सावरकरांविषयी बोलण्याआधी सावरकर वाचा

इमेज
  सावरकर या नावाचे भारतीय इतिहासात एक वेगळे स्थान आहे. भारताचा इतिहास सावरकरां शिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही. सावरकरांविषयी अनेकांना कुतूहल असतं, कुणी ते मान्य करतं कुणी ते नाही स्वीकारत, ज्याचा त्याचा प्रश्न पण सोशल मीडिया, इलेक्ट्रोनिक मीडिया वर सावरकरां विषयी निरर्थक कमेन्ट केली की ट्रेंड होतं हे नक्की ! प्रसिद्धी मिळते असे काही बालबुद्धी मानतात आणि तसे वागतात सुद्धा. देव त्यांचे भले करो. पण हे नक्की असतं की या सर्व बालबुद्धींनी सावरकर वाचलेले नसतात. सावरकर कोण आहेत याचा थोडाही अभ्यास या लोकांनी केलेला नसतो. फक्त कानोपकानी गोष्टी पसरविणे आणि चिखलफेक करणे एवढाच काय तो यांचा अजेंडा असतो.             सावरकर कुण्या सोम्या- गोम्याला समजत नाही एवढं मात्र नक्की. कारण या सोम्या- गोम्यांच्या बुद्धीची तेवढी क्षमताच नसते. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते, विज्ञानवादी सावरकर, साहित्य प्रभू सावरकर, महाकवी सावरकर, समाजसुधारक सावरकर, क्रांतिवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, पत्रकार, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाषा शुद्...

वाणीची जादू- संवादातून जिंकली मनं

इमेज
  माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे , असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु समाजात राहण्यासाठी केवळ ज्ञान , पदवी किंवा संपत्ती पुरेशी नसते ; माणसाला माणसांशी जोडून ठेवणारा जो अदृश्य धागा असतो , तो आहे – संवाद . विचार , भावना , अनुभव आणि अपेक्षा यांची देवाणघेवाण करण्याची कला म्हणजे संवाद. आणि ही कला जितकी प्रभावी , तितके व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि यशस्वी बनते. संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो. योग्य शब्दांची निवड , ऐकण्याची क्षमता , चेहऱ्यावरील भाव , शरीरभाषा (देहबोली) आणि समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर यांचा समन्वय म्हणजे प्रभावी संवाद. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे ज्ञान अफाट असते , पण ते योग्य पद्धतीने मांडता येत नसल्याने त्याला अपेक्षित यश मिळत नाही. उलट काही व्यक्ती आपल्या प्रभावी संवाद शैलीमुळे लोकांच्या मनात सहज स्थान निर्माण करतात.             व्यवसाय करीत असताना संवाद कौशल्य महत्वाचेच आहे. तुमचा व्यवसाय तुम्हाला घडवतो, शिकवतो, व्यवसायात तुमचे समर्पण असायला हवे ही एकच अट यामागे असते. ज्याच्याकडे हे समर्पण असतं...

सावरकर - राष्ट्र तपस्वी

इमेज
  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की , त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद , दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष , त्याग , राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही.   सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते , तर ते क्रांतिकारक , साहित्यिक - ( भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा ), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी ...

घुटमळलेलं मन

इमेज
            सकाळीच आठवणं झाली , तशी या साठी काही विशेष दिवस असे काही लागत नाही. साऱ्या गोष्टी डोळ्या समोर सहज तरळून जातात. सिनेमाच्या पडद्यावर जशा फ्लॅशबॅक स्वरूपात दाखवल्या जातात ना अगदी तशाच ! सारं काही कालच घडलं असं वाटतं, आपण हतबल होऊन फक्त वाट पाहत होतो पण नियतीला तिचा डाव साध्य करायचा होता तो तिने केला. मेंदूतील रक्तस्त्राव पूर्ण क्लिअर करणं खूप जटिल प्रक्रिया, त्यात झालेला रक्तस्त्राव क्लीन करे पर्यन्त नुकसान झालेल्या पेशी , त्यामुळे होणारे इतर परिणाम हे सारं खूप गुंतागुंतीच आहे. तरी सकाळी ऑपेरिटीव पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “खूप सहन केलं त्यांनी”, एक डॉक्टर हे म्हणतो याचा अर्थ त्या ऑपेरेटीवने होणाऱ्या वेदनांचा अंदाज त्यांना असतोच. एवढ्या वेदना सहन केल्या पण शुद्ध काही आली नाही.             तो निर्जीव पांढराशुभ्र हॉस्पिटलचा कॉरिडॉर , औषधांचा उग्र वास , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर शांतत्व आणि आतून सतत धडधडणारं मन — आजही सगळं तितकंच जिवंत वाटतं. आपण बाहेर उभे , पूर्ण हतबल. हातात काहीच...