सावरकर - राष्ट्र तपस्वी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की , त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद , दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष , त्याग , राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही. सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते , तर ते क्रांतिकारक , साहित्यिक - ( भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा ), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी ...