पोस्ट्स

प्रासंगिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

आपलं फक्त लक्ष नसतं...

इमेज
  “यु लर्न समथिंग एव्रीडे ईफ यू पे अटेन्शन”, खूप छान कोट आहे, कुण्या थोर विचारवंताचे विचार असावेत. वाचनात आले , मला आवडले. तसे पाहिले तर , खरे ही आहेत हे विचार, तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही काही ना काही शिकताच. नियमच म्हणा फार तर यास. नियमच का? तर नियम हे फार कुणास आवडत नाही, ते कायम नकोशेच वाटतात. म्हणून “नियम”, म्हणतात ना, आपलं फक्त लक्ष नसतं !.  ह्या धाव-पळीच्या जगात कुणास वेळ आहे ओ ! लक्ष द्यायला ? जो तो फक्त पळतो आहे. कुठे? कोणालाच माहिती नाही. मोठ्या शहरात साधारण हे पहायला मिळतं असा माझा गैरसमज होता पण तसे काहीच नाही. आमच्या शहरात देखील हे पाहायला मिळालं. त्यामुळे फारच आश्चर्य वाटू लागलं. तसं पाहिला तर सोलापुरात कुणासही विचारा , काय म्हणता ? कसे आहात? समोरून उत्तर ठरलेलं “काही नाही निवांत”. मग एवढी निवांत असणाऱ्या मंडळीना लक्ष देण्यास काय हरकत आहे? पण तसे होत नाहीच. ही सारी मंडळी देखील बहुधा नाकासमोर चालत असावीत. तसे पाहिलं तर विषय खूप साधा-सरळ आहे, आपल्या अवती भवती घडणाऱ्या गोष्टी कडे थोडसं लक्ष द्यायचं. म्हणजे नक्की काय करायचं ?असा प्रश्न देखील काही मंडळीना नक्की...

आनंदचा ‘मुरारीलाल’

इमेज
  “मुरारीलाल”, हे नाव कानावर पडताच डोळ्यासमोर कोण येतं? तुम्ही म्हणाल “आनंद” चित्रपटातील जॉनी वॉकर, खरं ही आहे ते वॉकर यांनी ती भूमिका बजावली नव्हती तर ते ती भूमिका जगले होते. पण राजेश खन्नास प्रतिसाद देणारे इसाभाई सुरतवाला हे पात्र त्यांनी निभावलं होतं. मुरारीलाल पात्र आपल्या समोर उभं करण्यात जॉनी वॉकर यशस्वी झाले, असेच मी म्हणेन. साद असेल तर प्रतिसाद हा प्रकृतीचा नियम पण तो सर्वानाच माहिती असतोच असे नाही. चित्रपटात एखादा दुर्धर आजार सोबत घेऊन फिरणारा, केवळ सहा महिने आयुष्य असणारा आनंद ! अनेकांना साद घालत फिरतो पण कुणीतरी एकच त्यास प्रतिसाद देतो. असेच साद घालत फिरणारा आनंद   तर आपल्या अवती भवती सुद्धा तुम्हाला   भेटत असतील. दिलखुलास आयुष्य जगणारे आनंद, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे, आयुष्य नितांत सुंदर आहे आणि ते भर भरून जगायला हवं म्हणून कृतीतून शिकविणारे आनंद ! एक नाव पण अनेक रूपं धारण करणारे आनंद ! तुम्हाला असा एखादा आनंद भेटला आहे का ? माझी रोज सकाळी अशाच एका “आनंदची” भेट होते. एक मित्र म्हणून नक्कीच रोज भेटावा असाच हा आनंद ! मॉर्निंग वॉक दरम्यान, प्रचंड ऊर्...

भाषा सक्ती आणि शिक्षण

इमेज
  विशेष टीप : हा लेख वाचताना कोणत्याही राजकीय चष्म्यातून वाचू नये. समाजात वावरताना जे पाहिलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे एवढचं. उदाहरण- १ एक कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी इ.१० वी परीक्षा पास (उत्तीर्ण) विद्यार्थिनी येते आणि तिला कोर्सचे अभ्यासक्रमाचे पुस्तक कोणते (मराठी की इंग्रजी भाषेतील) देऊ विचारल्यावर ती उत्तर देऊ शकली नाही. कारण ती म्हणते सगळं शिक्षण कन्नड भाषेत झाले आहे. वाचायला जे सोपे असेल ते द्या !! प्रवेशाच्या छापील नमुन्यावर (ऍडमिशन फॉर्म) स्वाक्षरी देखील कन्नड भाषेत करते. तिचं शिक्षण कर्नाटकात झालेले आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलेच असावे. संवाद हा पूर्ण मराठीत झाला हे येथे नमूद करणे क्रमप्राप्त आहे. उदाहरण- २ आज आपल्याकडील स्मार्ट फोन वर विविध ॲप्स उपलब्ध आहेत ज्यावर विविध भाषा शिकता येतात. हे उघड सत्य आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे आणि गरज पडल्यास ही मंडळी त्याचा वापर करू शकतील. ज्यावेळी मेंदू विकसित होत असतो (साधारण वयाच्या 14 वर्षा पर्यंत) ते म्हणजे प्राथमिक शिक्षण अशा वेळी सारे छोटे दोस्त स्मार्ट फोनचा सर्रास वापर करतातच हे सर्वांनाच माहिती आहे. हा व...

तुम्ही शिक्षित की साक्षर ?

इमेज
  शिक्षण म्हणजे नक्की काय? फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण की सुज्ञ, सुसंस्कृत होणं म्हणजे शिक्षण की नैतिकता आंगीकरण्याचं बळ मिळणं म्हणजे शिक्षण की  फक्त प्रश्न विचारणं म्हणजे शिक्षण ? पूर्वीच्या काळी एकच समाज शिक्षित होता त्यामुळे लिखा पढी , सरकारी दरबारी त्यांचाच रुतबा असायचा असे थोर इतिहासकार, समाजसुधारक यांनी लिहून ठेवलं आहे . १८१३ मध्ये ब्रिटिश सरकारने अर्थात राणी ने ईस्ट इंडिया कंपनीस शिक्षणात कंपनीची भूमिका असावी असे आदेश दिले आणि यासाठी सुमारे एक लाखांची तरतूद करण्यात आली. अशी तरतूद असण्याची ब्रिटिश सत्ताक भारता साठी ही पहिलीच वेळ. परिणामी स्थानिकांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीस देण्यात आली. पुरोगामी भारतीय मंडळीनी इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारास अनुकूलता दर्शविली. याच दरम्यान राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता, मद्रास, येथे संस्कृत महाविद्यालय आणि बंगाल मध्ये प्राच्य महाविद्यालये स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला. यावर प्रशासनाने इंग्रजी आणि आशिआई भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. साधारण १८१७ मध्ये प्रगतिशील बं...

“छावा” च्या निमित्ताने .....

इमेज
  इतिहासातील विविध विषय समजून घेणे , अधिक माहिती घेण्याचा, मिळविण्याचा प्रयत्न करणे ही आवडच, याच आवडीतून इतिहास समजून घेऊन त्याची माहिती इतरांना देणे, हा पण एक छंदच. नुकताच “छावा” चित्रपट प्रदर्शित झाला, आणि जी त्रोटक माहिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वाचली होती, ती अधिक समजून घेण्या विषयी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मग कादंबरी वाचन असेल, अथवा ऑनलाइन संकलन असेल. ऑनलाइन ! म्हंटल की भुवया उंचावल्या जाऊ शकतात, कारण तेथील उपलब्ध माहितीच्या सत्यतेवर   शंका घेतली जाऊ शकते. विकिपीडिया सारखे माध्यम ज्यात कुणीही बदल करू शकतं . ते किती सत्य माहिती देऊ करतं हा अभ्यासाचा विषय , म्हणून स्पष्ट पणे नमूद केलं की सत्यतेवर सिद्ध होऊ शकेल अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो खरा पण अद्याप “ज्ञानाची (छत्रपती संभाजी महाराज   समजून घेण्याची ) भूक” काही शमली नाही. “संभाजी” या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची एक नवी विडिओ बाइट पाहिली त्यात इतिहासातील कोणत्या लेखनाची विश्वासार्हता अधिक या विषयी माहिती दिली आहे. शुद्ध ऐतिहासिक लेखन महत्वाचं. कुणा...

वारसा जपणं आम्हाला झेपेल का ?

इमेज
  काही इतिहासकार (?) “छावा” चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून एवढे बेचैन झाले आहेत की राजे , औरंग च्या हाती लागले , पकडले गेले त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या तरी राजेंनी शरणागती पत्करली नाही, धर्माभिमान जागृत ठेवला पुढील पिढीस हाच धर्माभिमान कायम प्रेरणा देत राहिला आणि राहील यात शंकाच नसावी. हे सारं महत्वाचं राहीलच नाही, फितुरी कुणी केली ? त्याची जात काय होती? या साऱ्या गोष्टीत जात कशी घुसडता येईल हे महत्वाचं. दुर्दैव आहे !! ३३६ वर्ष झाली अजूनही छत्रपती संभाजी महाराज काय होते हे समजून घेताना जाती पातीवरून ए आय च्या युगात सोशल मीडिया रंगवणं सुरू आहे. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास समजून घेणं , पुढील पिढीस तो सांगणं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे विसरून चालणार नाही.   काही इतिहासकार (ब्राह्मण नसलेले) ज्यांनी संशोधन केलं आणि पुस्तकं लिहिली, छत्रपती संभाजी महाराज सर्वाना समजावेत यासाठी परिश्रम घेतले अशी सारी मंडळी सांगतात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरी मुळे राजे, औरंगच्या हाती सापडले... पण एक रील अचानक छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फिरतं आहे, त्यात कुणी फ्रेंचचा र...

छावा

इमेज
  आईचं प्रेम हे महत्वाचं असतच, ज्यास ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, असचं असतं. बालपणात तर सर्वात जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने जर कुणाची आई हिरावून नेली तर, हा विचार देखील करवत नाही. ज्यांना ह्या दू:खातून जावं लागलं ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. अगदी हेच आपल्याला लक्ष्मण उतेकर यांच्या “छावा” मध्ये पहायला मिळेल. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला सोस आला असा हा सिंहाचा छावा आयुष्यात प्रत्येक आघाडीवर झुंझत राहिला, पण त्याने कधीही हार मानली नाही. खरं तर तीन तासांच्या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना  जाणून घेणं केवळ अशक्य पण उतेकर यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. स्व. शिवाजी सावंत यांनी ८८६ पृष्ठ संख्या असलेल्या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज मांडण्याचा , समजावून सांगण्याचा, रणधुरंधराची कथा आजही इतिहासाची साक्ष देते आहे. अवघं बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला राजा पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाई करणारा लढवय्या सेनानी म्हणून ज्य...

अनसीन स्टेप्स : बिहाइंड सक्सेस

इमेज
अनसीन स्टेप्स : बिहाइंड एव्री सक्सेस   जीवनातील आव्हानं ही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांना स्विकारा आणि तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घ्या. यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास हवाच. मला वाटतं स्वप्न पाहणे ही एक सुरुवात असते, ती साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यकच असतात. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवा. असे प्रेरक विचार आपण वाचतो आणि त्याप्रमाणे आयुष्यात मार्गस्थ राहण्याचा निर्धार ही करतो. प्रवास कोणताही असो तो तुम्ही एन्जॉय करता की नाही यावर बरचं काही अवलंबून असतं, आयुष्याचा प्रवास असो अथवा शैक्षणिक, व्यावसायिक असो, तुमची एन्जॉयमेंट मॅटर्स ! तसे पाहिलं तर आमच्या कामतकरांकडे व्यवसाय करणारा मीच पहिला ! त्यामुळे जमेल का? स्थैर्य मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न, व्यवसाय कसा करावा याचं बाळकडू मिळालेलं आहे का? तर अजिबात नाही, पण मनात निश्चय पक्का , प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी सोबतच बाबा-आईचं मनोबल, पाठीशी आशीर्वाद, माझी बहीण आणि माझा विवाह झाल्यानंतर पत्नी यांच्या प्रेरणे मुळे, भक्कम पाठिंब्या मुळे व्यवसाय करणं मी शिकत राहिलो आणि आजही शिकतो...

संगणक प्रशिक्षणाचा रौप्य महोत्सव – विद्या कॉम्प्युटर्स

इमेज
  आज पर्यन्तचा प्रवास काही सोपा नव्हता, २५ वर्षे मार्केट मध्ये टिकून राहायचं , स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं ही काही साधी बाब नाही. अवघ्या दोन संगणकावर (286 & 386 प्रोसेसर) आणि ८० चौ. फुटाच्या हॉल मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज ३३  संगणक  (आय-7, आय-3 प्रोसेसर) आणि २००० चौ. फुटाच्या स्व-मालकीच्या जागेत “जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था” असे बिरुद मानाने मिरवीत सुरू आहे.    संगणक शिक्षण देणारी संस्था ते दर्जेदार संगणक शिक्षण देणारी आणि करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक मिळविणे, पालक आणि विद्यार्थी यांच्या विश्वासास पात्र ठरणे कधीच सहज शक्य नव्हते. सोलापुरात संगणक प्रशिक्षण देण्याच्या एस.ओ.पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) डिफाईन करणारे विद्या कॉम्प्युटर्स हे प्रथम संगणक प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी प्रत्येक कोर्स साठी विशिष्ट प्रशिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली गेली, प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याने किमान व्यावहारिक गोष्टींचा सराव  करणे अनिवार्य कर...