पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

जय श्रीराम

इमेज
मी २०१९ मध्ये लिहिलेला हा लेख आज पुन्हा शेअर करीत आहे कारण नुकतीच “वंदे भारत लोकार्पण कार्यक्रमावेळी मा. मुख्यमंत्री यांना "श्रीराम" जयघोष खटकला !! अशीच घटना मागे २०१९ मध्ये तिथेच घडली आणि २०१५ ची आठवण झाली. त्यावेळी म्हणे भारतात असहिष्णुता वाढली होती , म्हणून पुरस्कार वापसी ची लाट आली होती. निमित्त होते मोदी सरकार च्या पहिल्या इनिंग ची सुरुवात आणि कमजोर विरोधी पक्ष ! सुरुवात झाली ती   कन्नड़़ लेखक एम.एम. कलबुर्गी   यांच्या हत्येने आणि मग एकाच वेळी ४० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले मग बॉलीवूड मधील काही मंडळी पुढे आली आणि म्हणाली “भारत सुरक्षित देश नाही” , आणि बरचं काही यावर विविध न्यूज चॅनल्सवर चर्चा , वादाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या , संसदेत देखील यावर चर्चा झाली आणि बराच धुराळा उडाला !! हा विषय एवढा वाढला होता कि पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना ब्रिटन च्या पंतप्रधानानी या विषयी मोदिंसोबत असहिष्णुते बद्दल चर्चा करावी या विषयी या मान्यवर लेखकांनी पत्र व्यवहार देखील केला होता. साहित्य अकादमी चे माजी अध्यक्ष श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या ११ ऑगस्ट २०१८ च्या लेखाच

टी.आर.पी. साठी काही पण – आमचा मात्र निषेध !!

इमेज
आजकाल विविध न्यूज वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार ( त्यांच्या लेखी ) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल, पण हल्ली विविध प्रकारचे विशेष शो चालविले जातात ज्यामध्ये चालू घडामोडी वर मान्यवर व्यक्तींचे मत त्यावर चर्चा (नावालाच- खरं तर ती भांडणं वाटतात) पण अशा शोज ना भरपूर मागणी असल्याने विविध न्यूज चॅनल्स ची यामध्ये स्पर्धा सुरु आहे अस दिसतं. हि स्पर्धा एवढी भयंकर आहे कि त्यासाठी हि मंडळी काहीही करू शकतात याचा प्रत्यय वारंवार येतो. चॅनल्स च्या मालक मंडळीना यात पैसा दिसत असतो आणि शो च्या सूत्रधारास स्वत:ची प्रसिद्धी दिसत असते, या प्रसिद्धी पायी कोणत्याही विषयावर अकलेचे तारे तोडण्यास हि मंडळी तयार असतात असचं चित्र बऱ्याचदा दिसतं. देशभक्ती आणि देशाची काळजी असेल तर ती फक्त या मंडळींनाच !! दुसऱ्यांना उघडा डोळे म्हणत बऱ्याच विषयांवर सूत्रधार त्याचे ज्ञान पाझळताना दिस

मैं शायर बदनाम

इमेज
१९७३ साली नमक हराम हा हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट अनेक कारणांनी हिट नव्हे सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील अमिताभ यांच्या अँग्री यंग मॅन च्या छबीने प्रेक्षकांच्या हृदयातील स्थान अधिक भक्कम केले होते. लीड रोल ला काकाजी होते पण बच्चन साहेब भाव खाऊन गेले, अनेक दृश्यांमध्ये हे प्रकर्षाने पहायला मिळते, हा संवाद, “कौन है वो माय का लाल जो अपनी मां का दुध आजमाना चाहता है ?” म्हणणारा अमिताभ (चित्रपटातील विकी) कुणी विसरला असेल तर नवलचं ! या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्याचं गीत आणि संगीत, हि जबाबदारी आनंद बक्षी आणि पंचम दा नी अगदी उत्तमप्रकारे सांभाळली आहे. नदिया से दरिया, दिये जलते है आणि मै शायर बदनाम हि काही गाणी आजही अगदी एव्हरग्रीन वाटतात, अर्थात या मध्ये किशोर यांचा जादुई आवाज मोलाची भूमिका पार पाडतो यात शंकाच नाही. सर्व गीतांमध्ये गीतकाराचे अनन्य साधारण असे योगदान आहे कारण जे जादुई अर्थपूर्ण शब्द आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत त्यास तोडच नाही, गीताच्या शब्दांमध्ये दडलेला अर्थ उलगडायचा प्रयत्न केला तर नव-नवीन अर्थांची क्षितिजं पादाक्रांत केल्याचा आनंद मिळतो. आता हेच पहा

सावधान – हि तर धोक्याची घंटा

इमेज
सुजाण पालकत्व- टेक २ साहिल चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सोलापुरात झाल , नुकतीच बारावी झाली आता पुढील शिक्षण कुठे घ्यायचे या विषयी घरात खल सुरु झाला , आणि शेवटी ठरलं "विद्येच्या माहेर घरी" म्हणजे पुण्यात शिक्षण पूर्ण करायचं त्याप्रमाणे साहिल ला पुणे येथे शिक्षणास ठेवले. साहिल ने मन लावून अभ्यास केला परंतु पदवी शिक्षण होई पर्यन्त त्याचे प्रयत्न कमी पडले , आणि YD हा नविन शिक्का त्याच्या बायोडेटा वर पडला. YD (ईयर डाऊन अस काहीतरी मुल म्हणतात) असताना गावी परत आला , स्वगृही दिवस मजेत जात होते , त्यास भविष्याची फारशी चिंता नव्हती , आई आणि वडील दोघेही उच्च पदस्थ अधिकारी , घरात कोणत्याच गोष्टी ची कमतरता नव्हती. सगळं अगदी भरभरुन !! साहिल ने त्याचे पदवी (आजकाल पदवी म्हणालं कि इंजीनिअरिंग च बर का !) शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातच एका कंपनीत नोकरीस लागला. सगळ कसं अगदी मनासारखं ! आई-बापास अजुन काय हवं ? आपलं लेकरु आयुष्यात सेटल होत आहे हे पाहुन साहिल चे आई   वडील आनंदुन जायचे , पण काही दिवसातच साहिल ची कुरकुर सुरु झाली , साहेब असेच आहेत , ते सारखं असंच करतात , तसंच करतात , ऑफि