पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

इमेज
  ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.   ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? क...