पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

इन्कलाब झिंदाबाद

इमेज
“इन्कलाब झिंदाबाद” हा नारा शहीद भगतसिंग यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्ली विधानसभेत ब्रिटीशांचे लक्ष वेधण्यासाठी जेंव्हा बॉम्बस्फोट (रिकाम्या बाकावर) केला तेंव्हा दिला , हे आपण सगळेच जाणतो. स्वतंत्रता मिळविणे , नव चेतना जागविणे हेतूने, एक संघता राखण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हा नारा दिला. अनेकांनी प्राणाची आहुती दिली मग या देशास स्वातंत्र्य मिळाले. “इन्कलाब झिंदाबाद” याचा इंग्रजी मध्ये अर्थ होतो, “Long Live Revolution” ज्यास हिंदीत “क्रांती अमर रहे” असे म्हंटले जाते. प्रत्यक्षात “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा उर्दू कवी व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी १९२१ मध्ये सर्व प्रथम लिहिला. याचा वापर भगतसिंग यांनी १९२९ मध्ये केला. १९१७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात क्रांतीचे वारे वाहू लागले होते,आर्यलंडच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते, आता हाच धागा भारतातील तरुणांनी पकडला आणि बदलाचे वारे वाहू लागले. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्या समाप्ती नंतर भारतात असंतोष पसरू लागला होता, लोग रस्त्यावर उतरू लागले होते. या जागतिक युद्धात भारतीय...

गीग इकॉनॉमी म्हणजे काय ?

इमेज
भारतात हि एक नवी अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे. विविध सेवा मागणारा एक वर्ग आणि त्या सेवा पुरविणारा दुसरा वर्ग असे या गीग इकॉनॉमी मध्ये म्हंटले जाते. ज्यास आपण टास्क बेस्ड इकॉनॉमी अस संबोधू. पण गीग म्हणजे काय तर एखादी सेवा पूर्ण करणारा एक व्यक्ती अथवा त्याच्या सारखे अनेक व्यक्ती जे एखाद्या सेवेसाठी पुढाकार घेतात आणि ती सेवा पूर्ण करतात. एखादं उदाहरण घेऊया, सुरेशला त्याच्या कंपनीच्या प्रमोशन साठी मार्केटिंग करणे हेतू सेवा घ्यायच्या आहेत, तर त्यास यामध्ये मदत करणारा एक वर्ग जो त्याचा कर्मचारी नाही पण तो /ती सेवा देण्यास समर्थ आहे असे त्यास सेवा देतील (सेवेची किमत हि बोली लावून अथवा जाहीर करून करता येते.) आणि त्या सेवेच्या मोबदल्यात आर्थिक उलाढाल होईल. ज्यास फ्री लान्सिंग असं म्हणतात, म्हणजे सेवा पुरविणारा / देणारा  होण्याकडे भारतात कल वाढतो आहे, कारण हा नऊ ते पाच असा जॉब नाही ठरू शकतं, सेवा देणारा त्याच्या सोईने सेवा पूर्ण करू शकतो फक्त ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करणे यास महत्व देण्यात येते, आणि मला वाटतं ते आवश्यक आहे.           संपूर्ण जग...

आ री आ जा - बाबांच अंगाई गीत

इमेज
मराठी चित्रपट असो कि हिंदी चित्रपट दोन्ही चित्रपटात अंगाई गीतांना आगळेच महत्व आहे. कधी लिंबोणीच्या झाडा मागे झोपणारा चंद्र, तरी कधी डोळ्यात झोपेस येण्याचे आवतण देणारी आई, एक हवाहवासा वाटणारा फील देण्याचे काम या गीतांनी केले आहे. अंगाई गीतांचे वैशिष्ट्य असे कि याचे बोल जितके भावनिक, संगीत तितकच हृदय स्पर्शी, या अंगाई गीतांमध्ये आईची माया, प्रेम ओतप्रोत अनुभवण्यास मिळतं, काही गीतं ऐकताना डोळ्याच्या कडा कधी ओलावतात कळतच नाही, असचं एक गीत आहे, “कुंवारा बाप” या चित्रपटात, निर्माता अमरलाल छाबरिया आणि निर्देशक महमूद !! १९७४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात “आ री आ जा, निंदिया तू ले चल कही”, हे गीत आहे. हे देखील अंगाई गीतच आहे पण या वेळी स्क्रीनवर आई नाही, तर बाबा, दाखवला आहे. महमूद यांनी चित्रपटात रिक्षाचालकाच्या भूमिकेस पुरेपूर न्याय दिला आहे. किंबहुना ती भूमिका महमूद जगले आहेत असे म्हणाले तरी योग्य होईल. एका रिक्षाचालकास सोडून दिलेलं बाळ सापडतं, तो त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यात अयशस्वी होतो, त्याला जेंव्हा कळतं मुलास पोलिओ झालेला आहे तेंव्हा त्याचं मनपरि...