पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

मोह

इमेज
  शून्य अवस्था काय असते ? कधी अनुभवली आहे का? माणूस काहीच निर्णय घेऊ शकत नाही अथवा काहीच सुचत नाही (अंधकार पसरतो) अशा अवस्थेस मी शून्यावस्था म्हणतो. माणूस देवळात जातो आणि काही ना काही तरी त्या देवाकडे मागतो, प्रत्येकवेळी तो काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो कधीच देवाला भेटायला जात नाही, अर्थात ज्याच्याकडे श्रद्धा, भक्ति आहे तोच हा खटाटोप करतो- कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. भगवद् गीते मध्ये सांगितले आहे, आत्मिक संपत्ती हीच स्थिर, शाश्वत संपत्ती आहे, तिच्यात जो दोष निर्माण करतो तो “मोह”. “मोह” हा कुणाला चुकलाय ? सगळे ‘या’ मोह पाषात अडकून राहतातच, फक्त जेंव्हा आत्मा नश्वर शरीराचा त्याग करतो तेंव्हाच हा मोह सुटतो , मोह असतो तो पर्यन्त प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. अनंताच्या प्रवासाला जाणारी मंडळी देखील यापासून परावृत्त असतात म्हणूनच त्यांना मोहत्याग करता येतो अस काहीतरी असावं, मी काही यातील तज्ञ नाही त्यामुळे ठोस मत व्यक्त करू शकत नाही, पण अनुभवा आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे,एवढचं. गीते मध्ये व्याधींचे मूळ म्हणजे ‘मोह’ ,असे सांगितले आहे. मनुष्य...

पल पल दिल के पास – एक मास्टरपीस

इमेज
  संगीतकार कल्याणजी-आनंदजी , गीतकार राजेंद्रकृष्ण आणि किशोरदांच ऑल टाईम हिट गाणं , सगळ्यांच फेव्हरीट गाणं अशी ज्या गाण्याची ओळख सांगता असं गाणं म्हणजे “पल पल दिल के पास” , प्रत्येकाच्या ओठावर असणारं गाणं आणि तितकच “दिल के पास” सुद्धा असणारं , गाण्याची सुरुवात ज्याप्रकारे चित्रित केली आहे , त्यास त्याकाळी (मला वाटत सध्या देखील) तोडच नाही , राखी जी पत्र हातात धरून वाचत आहेत आणि धरमपाजी पत्रातून गाणं (नायिकेची कल्पना) म्हणत आहेत. जणू काही पत्रात तोच मजकूर लिहिला आहे. या गाण्याची खासियत मला आणखी एक वाटते , गाण पाहताना दोन स्क्रीन दिसतात , एकावर राखी जी दिसतात तर दुसऱ्या स्क्रीन मध्ये पाठीमागे धरमपाजी दिसतात. हा कल्पनाविष्कार खूपच उत्तमरित्या चित्रित केला आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेला ब्लॅकमेल हा विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट. भलेही चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही पण संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचं एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचं संगीत नक्कीच उजवं ठरतं. गाणं कसं चित्रित करावं यावर आनंदजी यांची चांगली पकड असायची त्यानुसार त्यांनी अनेक चित्रपटातून याची झलक दाखविली आहे पण य...