पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

दुसरं महायुद्ध, “चले जाव” आणि स्वातंत्र्य

इमेज
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना , अनेक विचार मनात घोळत राहतात, आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले का? आपण त्याचा योग्य वापर करीत आहोत का? खरी लोकशाही रुजविण्यात आपण भारतीय नागरिक म्हणून यशस्वी झालेलो आहोत काय? नैतिक मूल्य जोपासली जातात का? संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकवेळी सांगितले जातात पण कर्तव्यांची जाणीव झालेली आहे का? नसेल झालेली तर ती कधी होणार? अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण याची उत्तरं एक भारतीय म्हणून आपल्यालाच शोधावी लागतील, “मी भला आणि माझं घरं भलं” असे म्हणून चालणार नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो पर्यायाने देशाप्रती आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवायची जास्त गरज वाटते मला. देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर आहेत, देशावर होणारा कोणत्याही प्रकारचा आघात ते परतवून लावू शकतात. पण देशांतर्गत उद्भविणाऱ्या संकटांना एक भारतीय म्हणून आपल्यालाच सामोरे जावे लागेल. २१ व्या शतकात डिजिटल युद्धास आपण नकळत सामोरे जात आहोत, वेळीच जागे होणे क्रमप्राप्त आहे. या युद्धात देशाची संपत्ती असलेल्या युवक वर्गास लक्ष्य केलं जात आहे. ...

शापित

इमेज
  आयुष्यात अग्रेसर रहावं असे सगळ्यांना वाटतं. आयुष्यात सर्जनशील असणं खूप महत्वाचं असतं , ते एक उत्तम कौशल्य आहे, सगळ्यांकडे ते असावं पण असेलचं असे नाही. शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना थोडा वेगळा विचार केल्यास त्यास “सर्जनशील” असे नामकरण केले जाते, किंबहुना सर्जनशील लोक विविध भूमिकां मध्ये त्याचां योग्य वापर करू शकतात. सर्जनशीलता म्हणजे केवळ कलात्मकता असणे नाही, या क्षमतेचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण मार्ग विकसित करणं. ही “सर्जनशीलता”असावी का? तर त्याचे उत्तर होकारार्थी आहे, हो ती असावी !! पण किती असावी ? कोणत्या विषयात असावी? कुठे असावी? याची उत्तरं तुम्हालाच शोधावी लागतात. ही उत्तरं शोधत असताना तुम्हाला काही नवीन चेहरे पहाण्यास, अनुभवण्यास मिळतात, नवा “तगडा” अनुभव मिळतो आणि हो सर्वात महत्वाचं , एक नवा प्रश्न तुम्हास पडतो की तुम्ही “सर्जनशील” का आहात? हे सगळं अॅट वॉट कॉस्ट ?? कॉस्ट फॉर ऑपर्चुनिटी की ऑपर्चुनिटी कॉस्ट? मिळविलेल्या, निर्माण केलेल्या संधीसाठी खर्ची घातलेला वेळ, श्रम, पैसा सारं सारं व्यर्थ होतं.. आपण काहीच करू शकत नाही. काही करू शकत ...