पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

इमेज
  “ सोलापूर” हे नाव उच्चारताच मनात अनेक परिचयाच्या गोष्टी उजळून निघतात—टेक्सटाइल उद्योगाचे भक्कम केंद्र , हुतात्म्यांच्या त्यागाने पावन झालेली भूमी , श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाछायेत न्हालेली नगरी आणि महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात वेगाने पुढे येणारे शहर. या सर्व ओळखींसोबतच , मागील दोन दशकांत शिक्षणाच्या क्षेत्रात सोलापुरात घडलेले परिवर्तन विशेषत्वाने नोंद घ्यावे असे आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांतून आकारास आलेले स्वतंत्र विद्यापीठ , नव्याने उभारलेली तंत्रमहाविद्यालये , तसेच खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून विस्तारलेले उच्च शिक्षणाचे दालन—या सर्वांनी मिळून सोलापूरला शिक्षणसमृद्ध शहराची नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. साक्षरतेच्या आकडेवारीत सातत्याने दिसणारी वाढ आणि अनेक महाविद्यालयांना प्राप्त झालेला “स्वायत्त” दर्जा हा या प्रगतीचा ठोस पुरावा आहे. एक सोलापूरकर म्हणून हा प्रवास अभिमानाने उर भरून येईल असा आहे. याच शैक्षणिक प्रवासाला पूरक ठरत , शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त , मॉड्युलर स्वरूपातील अभ्या...

पहिली शस्त्रक्रिया : भीती, धाडस आणि शरीराशी झालेला नवा संवाद

इमेज
  हृदयाची वाढणारी धडधड, काळजी आणि पुढे काय आणि कसे होणार? हा अनुत्तरित प्रश्न ! अर्थात उत्तर लागलीच मिळणारच होतं पण मिळेपर्यंत सोबत करणारी एक अनामिक भिती ! हो भीतीच, कारण आयुष्यात प्रथमच एखाद्या ऑपरेशनला सामोरे जात होतो. हॉस्पिटल मध्ये सोबत करणे ठिक असतं,पण ऑपरेटीव प्रोसीजर स्वत:च पाहणे आणि त्यात सामील होणे हे प्रथमच ! त्यामुळे नाही म्हंटल तरी टेंशन आलेलच होतं. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर देखील थोडं वाढलं. ऑपरेशन हा शब्दच मुळी धाडस दर्शवितो, मग ते सैन्य दलात असेल, अथवा हॉस्पिटल ! फार काही नाही पण “धाडस” या शब्दाचा मला चांगला समजलेला अर्थ असा की भिती असतानाही धोक्याचा सामना करण्याची मानसिक ताकद. डॉक्टरांवर विश्वास ठेवला की फार काही धाडस करण्याची गरज नसते पण मनुष्य प्राणी सहजा सहजी असे काही करत नाही, तसा तुम्हालाही अनुभव असावाच !           सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की फार काही “सीरियस” असे घडले नाही, फक्त मी हे प्रथमच फेस केलं म्हणून त्याचं अप्रूप ! बाकी अशा अनेक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात आणि रुग्ण हसत हसतं घरी देखील जातात. मी देखील...

भारत विरुद्ध इंडिया : शिक्षण, एआय आणि हरवलेली दिशा

इमेज
  शहर आणि गांव / खेड यांच्यातील संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये एक मोठी दरी दिसतेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण ! यात देखील एक मोठी दरी पहायला मिळते. भारत आणि इंडिया यातील दरी सतत वाढणारी राहील असे चित्र आजतरी दिसतं आहे. डिजिटल क्रांती भारतात (गावात) आली नाही असे नाही पण अद्याप भारत इंडियाशी जोडलेला नाही हे त्रिवार सत्य आहे.  आता हेच पहा, शिक्षणांवर सर्वांचाच सारखाच अधिकार आहे, पण या भावी पिढीस आपण शिक्षित करीत आहोत की साक्षर ? की दोन्हीही नाही. शिक्षण क्षेत्रात वावरत असताना अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे मुलांना धड वाचताही येत नाही. लिहिणं तर खूप दूरची गोष्ट ! तुम्ही म्हणाल, काहीतरी सांगताय पण ही वस्तुस्थिती आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणारे आहेत हे नमूद करणे अनिवार्य आहे. ही मित्र मंडळी उत्तीर्ण कशी झाली? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कितीही कॉपी मुक्त अभियान चालविले तरी नैतिकता कशाशी खातात हे जो पर्यन्त समजणार, शिकणार नाही तो पर्यन्त काहीही फरक पडणार नाही. असे विद्यार्थी त्यांचं शालेय शिक्षण संपवून जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा या स्पर्धेच्या युगात ही मित...