पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके – गीतकार समीर

इमेज
बहुत खुबसुरुत गजल लिख रहा हुं, तुम्हे देखकर आजकल लिख रहा हुं|| गीतकार समीर अनजान (शीतला पांडे) यांना आपण “समीर” म्हणून ओळखतो. गीतकार अनजान यांचे चिरंजीव, एवढीच ओळख घेवून चित्रपट सृष्टीत आलेले बँक अधिकारी समीर यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख तयार केली. किंबहुना ते त्यात यशस्वी झाले असे म्हणाल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सर्वात जास्त गाणे लिहिण्याचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स समीर यांच्या नावे आहे. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गाणी वडिलांकडून लिहून घेतली जातात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा पण जेंव्हा संगीतकारा समोर बसून गाणी लिहली तेंव्हा सर्वाना पटलं कि “बॉलीवूड ला एक नवा गीतकार समीर” मिळाला. मनाला सोन्याची (सोना कितना सोना है) उपमा देणारा हा गीतकार म्हणजे अगदी सहज यमक जोडणारा जादुगार म्हणावा, १९८३ मध्ये गीतकार म्हणून नवी सुरुवात करणारे समीर यांनी लवकरच आशिकी या चित्रपटासाठी फिल्म-फेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले. समीर यांनी त्यांचे वडील गीतकार अनजान ,मजरूह सुलतानपुरी आणि उस्ताद आनंद बक्षी यांना गुरु स्थानी मानले. तुम दिल कि धडकन में अस म्हणत समीर ...

बदलाचे साक्षीदार व्हा, पुढाकार घ्या

इमेज
गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपणारी परंपरा, अर्थात आपण सगळेच हि परंपरा जपत असतो अस म्हणाल्यास वावगं होणार नाही. दरवर्षी श्री गणेशाच्या आगमनाची तयारी आणि विसर्जनाची देखील तेवढीच तयारी प्रत्येक जण यथासांग ज्याच्या त्याच्या परीने करीत असतो. हे करीत असताना विविध रूढी, परंपरा यांचा मान राखणं हि तेवढच महत्वाच असतं आणि हे संभाळणे कोणासही सांगणे न लगे ! बाप्पा येणारं म्हंटल कि घरात केलेली सजावट, रोषणाई ने घर तर फुलून जातच पण सार्वजनिक गणेशोत्सवात केलेल्या रोषणाई ने आसमंत खुलून जातो. हे दहा दिवस म्हणजे आनंद उत्सवाचे असतात, गणेशास काय हवयं, काय नकोय याकडे सगळेच लक्ष ठेवून असतात. दहा दिवसांचा पाहुणा म्हणून कि काय, त्याच्यावर असणारी श्रद्धा म्हणा नाहीतर त्याच्यावरील प्रेम म्हणा किंवा आपल्या हक्काचा , जवळचा भासणारा ईश्वर म्हणा या सगळ्यामुळे खूप काळजी घेतली जाते. परमतत्व ओंकाराचे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो, तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपण सर्वजण दरवर...

ये जो पब्लिक है, यह सब जानती है

इमेज
कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर मत व्यक्त करण्या एवढा माझा अभ्यास नाही, पण ज्या प्रकारची परिस्थिती सध्या भारतीय राजकारणात दिसत आहेत, घडतं आहेत त्यावर व्यक्त व्हावे या उद्देशाने हा लेख प्रपंच ! ! २०१४ च्या लोकसभेत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना मताधिक्य मिळाले आणि भाजपा चे सरकार सत्तेत आले. देशास मा.नरेंद्र मोदींच्या रूपाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे पंतप्रधान मिळाले. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाच्या जोरावर जनतेने पुन्हा २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने भाजपास निवडून दिले आणि पुन्हा सत्ता भाजपाचीच आली, भारताच्या इतिहासात अनेक वर्षानंतर एकाच पक्षास बहुमत मिळाले होते. मला आठवते २१ जून १९९१ मध्ये जेंव्हा मा.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान झाले होते त्यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी एक विधान केले होते, कि या देशास फक्त कॉंग्रेसच स्थिर सरकार देवू शकते आणि लोकसभेचा कार्यकाळ पुर्ण करू शकते”, पण जनतेने ज्याप्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये कल दिला ते पाहता जनताच खरी राजा, “ये जो पब्लिक है, यह सब जानती है”, उस्ताद आनंद बक्षी यांच्या गीताप्रमाणे मा.नरसिंहराव यांचा दावा पुरता मोड...