कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया

इंस्टिट्यूट मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात
विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला
होता, इंस्टिट्यूट येथील समोरच्या जागेत रांगोळी काढण्यात आल्या, यासाठी परीक्षक
म्हणून येथील महिला मंडळातील पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही महत्वपूर्ण भूमिका
पार पाडली. हे सारं घडत होतं, गीतकार
गुलशन बावरा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मिले जो कडी कडी एक जंजीर बने,
प्यार के रंग भरो, जिंदा तस्वीर बने”, आज या गोष्टीस २1 वर्ष लोटली, विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास
ठेवून पालकांनी त्यांच्या पाल्यास आमच्याकडे संगणक शिकण्यास पाठविले आणि आम्हास
जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था असा नाव
लौकिक मिळवून दिला, शतश: धन्यवाद !!
सुशील रसिक सभागृहात तर जल्लोष !!
आनंदास उधाण आलं होतं , अख्खं सभागृह विद्यार्थी आणि स्पर्धकांनी डोक्यावर घेतलं
होतं, हे सर्व लांबून पाहणारे आणि लक्ष ठेवणारे आमचे “विद्याचे” स्वयं-सेवक होतेच
तिथे !! नियोजन आणि सादरीकरण एवढं उत्तम होतं की प्रमुख पाहुणे व्यंकटेश कामतकर
यांना हे सारं सारं भावलं ! त्यांनी विद्यार्थी आणि उपस्थित सोलापूरकरांना
मार्गदर्शन करताना विद्या कॉम्प्युटर्सच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद
दिले, त्याच शिदोरीवर आम्ही आज पर्यन्त
मार्गक्रमण करीत आहोत आणि करीत राहू.
फोटो अल्बम मध्ये सामावलेलं विद्या
कॉम्प्युटर्सचं छोटसं जग, आमचं “आनंदाच पान” आज या निमित्ताने तुमच्यासोबत शेअर
करताना अभिमानाने उर भरून आला आहे.
ता. क.: या वर्षी विद्या कॉम्प्युटर्स रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
अमित बाळकृष्ण
कामतकर
संचालक- विद्या कॉम्प्युटर्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा