पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड

इमेज
  जिथे आपल्या भावना अलगद गुंतत जातात , तिथे नकळत एक नातं आकार घेतं. त्या नात्याला श्वास घेण्यासाठी मनुष्याचंच अस्तित्व आवश्यक असतं असं नाही. कधी एखादी निर्जीव वस्तूही आपल्या भावविश्वात स्थान मिळवते. तिच्याशी शब्दांविना संवाद साधला जातो , आठवणी गुंफल्या जातात आणि हळूहळू ती आपल्या मनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणूनच भावनांना स्पर्श झाला की नातं निर्माण होणं अटळ ठरतं—ते जिवंत असो वा निर्जीव , नातं मात्र तितकंच खरं असतं. आता हेच पहा ना, १९२२ साली ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला एक पूल , त्याच्याशी एक सोलापूरकर म्हणून काय नातं असू शकतं? म्हंटल तर काहीच नाही, अथवा अनेक आठवणी या सोबत जोडलेल्या असू शकतात. सोलापूरकरांनी अनेक वेळा त्याचां वापर केला, पण कालपरत्वे पूलाची कालमर्यादा संपली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल पाडावा लागणे साहजिकच आहे. आता जमाना सोशल मिडियाचा आहे, या पुलाच्या कार्यकाळात म्हणजे १०३ वर्षात त्यास जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी अवघ्या काही दिवसांत मिळाली. तिथे पूल आहे, ज्याचा वापर आपण करीत आलो आहोत हे देखील सोशल मीडियाने अधोरेखित केले. पूल पाडण्याच्या काही दिव...

माहिती तंत्रज्ञान युगातील मक्तेदारी : संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा- भाग २

इमेज
 पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करावं - माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात मक्तेदारीचा प्रभाव अधिक तीव्र होत चालला आहे. भाग १ मध्ये आपण डिजिटल मक्तेदारीची संकल्पना, तिची कारणे आणि तिच्या वाढीमागील तांत्रिक प्रवाहांचा परिचय घेतला. आता, भाग २ मध्ये आपण त्या मक्तेदारीमुळे निर्माण होणाऱ्या वास्तवातील संधी आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करणार आहोत. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची वाढती सत्ता बाजारपेठेचे स्वरूप कसे बदलते, नवकल्पनांवर कसा परिणाम करते आणि ग्राहकांच्या अधिकारांसमोर कोणत्या अडचणी उभ्या करते, याचा अभ्यास या भागात मांडला आहे. यासोबतच भविष्यातील दिशादर्शन, नियामक ढांचा आणि डिजिटल युगात संतुलित व न्याय्य स्पर्धा कशी राखता येईल हेही पाहणार आहोत. IT युगातील मक्तेदारीचे बदलते चित्र समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ३. तरीही काही कंपन्या प्रभावशाली का ? तांत्रिक क्षेत्रात मक्तेदारी अवघड असली तरी काही कंपन्यांनी प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे: अ. नेटवर्क इफेक्ट्स ( Network Effects) काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर जितके ...

माहिती तंत्रज्ञान युगातील मक्तेदारी : संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा

इमेज
  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका कंपनीची मक्तेदारी राहणे अवघड कारण रोज नव-नवीन संशोधनं होत असतात मग त्यात रोज नव्याने भर पडते ती नवीन उत्तम सॉफ्टवेअर्स ची एकाच प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर देखील सहज उपलब्ध होताना दिसतात. याचा प्रत्यय गुगल (सर्च) केल्यास आपणांस आला देखील असेल, पण स्पर्धात्मक युगात कुण्या एका कंपनीची “मक्तेदारी” सुरु होणं पचनी पडत नाही, त्यास समर्थ असा पर्याय उपलब्ध असणं, होणं खूप महत्वाचं वाटू लागतं. आता हेच पहा ना, संगणका मध्ये इनपुट टूल मध्ये क्रांती आली ती “युनिकोड” मुळे ज्यामुळे मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा सहज गत्या दिसू लागल्या त्याचा तसा वापर ही वाढू लागला. मग प्रथम टाईप रायटर मध्ये ज्याप्रमाणे मराठी कि-बोर्ड लेआउट असतात त्याप्रमाणे मराठी येवू लागले, युनिकोड आल्यानंतर देवनागरी ह्या प्रकारात मराठी झळकू लागले, या नंतर इनस्क्रिप्ट हा प्रकार आणि मग देवनागरी फोनेटिक यामध्ये आपण जसे बोलू तसे टाईप होवू लागले, ज्यास सोप्या भाषेत आपण असे म्हणू कि “इंग्लिश कि-बोर्ड चाच वापर, पण “इंग्लिश टू मराठी” हा सर्वांच्या सोईचा प्रकार एका कंपनी ने देवू केला,यात अजून एक सुधारणा ...