ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

रिअर व्हीव मिरर – व्हेरी रेअर

 

केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८८ मधील सेक्शन ५ आणि ७ प्रमाणे प्रत्येक दुचाकी वाहनास दोन रिअर व्हीव मिरर (साईड मिरर (आरसे)) आवश्यक आहेत. नसल्यास रुपये २०० इतका दंड घेण्याचा नियम हा कायदा सांगतो. फॅशनच्या नावाखाली हे आरसे काढून टाकले जातात आणि वाहन चालक स्वत:हून आपघातास आमंत्रण देतं आहेत. मनुष्यास दोन डोळे आणि दोन कान, पाहणे आणि ऐकणे यासाठी दिले आहेत, मला वाटतं काळजी हे कारण असाव त्यामागे कारण ऐकू न आल्यास किमान डोळ्यास जे दिसतं आहे त्याचा उपयोग व्हावा आणि अडचणी दूर व्हाव्यात असे त्या परमेश्वरास वाटलं असावं पण दुचाकी वाहन चालक मागील वाहनांचा कानोसा घेतात  आणि त्याप्रमाणे अचानक वळण घेण्याचे अनेक प्रकार तुम्हीही पाहिले, अनुभवले असतील. तज्ञ मंडळी म्हणतात नियमांची पायमल्ली होणं  अथवा जाणीवपूर्वक करणं यात मानवी वर्तनाचे स्वरूप तपासण्याची गरज वाटते,

रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम शालेय स्तरापासून राबविली पाहिजे. दुचाकी वाहनास असणारे आरसे हे वाहन चालकाची रस्त्याची दृश्यमानता आणि वाहनचालकांचा निर्णयात सुधारणा करण्यास मदतगार ठरतात. आरशांचा योग्य कोन राखणं देखील आवश्यक असतं. लेनची शिस्त पाळण्यात देखील हे आरसे मदत करतात.  शहरातील आणि अलिकडे गांवांकडील देखील बऱ्याच मंडळींना वाटतं की शहरात गाडी / दुचाकी चालविताना आरसे आवश्यक नाहीत, विना आरसे वाहन जास्त आकर्षक दिसतं असंही काही मंडळीना वाटतं.. स्वत:ची आणि पर्यायाने दुसऱ्याची सुरक्षा जास्त महत्वाची वाटतं नाही हे दुर्दैव !!

          आजचा लेख अचानक नाही लिहावा वाटला तर अनेक दिवस, अनेक केसेस पाहिल्या आणि मग ठरवलं की या विषयावर लिहावं. विना आरसे दुचाकी दिसण्यास उत्तम दिसते म्हणून आरसे काढून टाकणे चुकीचे आहे, आरसे हे तुम्हाला दुचाकी चालविताना मदत करतात हे लक्षात घ्या आणि आरशांचा वापर जरूर करा स्वत: सुरक्षित रहा आणि इतरांची देखील काळजी घ्या.           

नियमांची पायमल्ली : हे काही विशेष नाही, असं म्हणायच फॅड आहे सध्या, कोणतीही गोष्ट सांगितली की काही विशेष नाही , माहिती आहे अथवा खूप शहाणा (पुणे स्टाइल) समजतोस काय स्वत:ला असा रीप्लाय मिळू शकतो नव्हे मिळतोच !! स्वातंत्र्य म्हणजे काय? हे समजून सांगण्याची वेळ आली आहे की काय असं वाटतं कधी कधी , जेंव्हा लोक सर्रास त्यांना हवं तसं वागतात. भारतीय राज्य घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य यात आपण भारतीय अधिकारांकडे जास्त लक्ष देतो (मनुष्य स्वभाव आहे) पण कर्तव्याकडे तेवढेच लक्ष द्यायला हवे. शाळेत शिकविण्यात आलेली राज्यघटना पुन्हा नव्याने नागरिक कर्तव्यांसह शिकण्याची गरज आज वाटते आहे. नियम हा मोडण्यासाठीच तयार केलेला असतो हा विचारच मुळी चुकीचा आहे. इथे मोटार वाहन नियम हा वाहनचालकांच्या सुरक्षे करिता तयार केलेला आहे हे ध्यानात घ्या मित्रहो !!!

एक भारतीय म्हणून राज्यघटनेने दिलेले अधिकार जेवढे महत्वाचे तेवढीच कर्तव्य देखील महत्वाची आहेत हे समजून घेऊया आणि त्यानुसार मार्गक्रमण करूया !!

 

संदर्भ: केंद्रीय मोटार वाहन कायदा

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर       

माझ्या यू-ट्यूब चॅनला भेट द्या आणि Subscribe करा.

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?