पोस्ट्स

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

मनमौजी किशोर- अद्वितीय प्रतिभेचा बादशाह

इमेज
  “अकेला गया था , मै , असे म्हणत किशोर सोबतीला येतो आणि तिथून पुढे संपूर्ण प्रवासात सोबत करतो. मग एल. पी, कल्याणजी आनंदजी , पंचम , बप्पी इतरही दिग्गज मंडळींच्या सुरांना किशोरने त्याचा जादुई आवाजाने अमरत्व बहाल केलं आहे. “मै हू झुम झुम झुमरू”, ने वाहनात नवचैतन्य निर्माण करतो.  तर कधी “हमसे मत पुछो कैसे मंदिर टुटा संपनो का”, अथवा “जिंदगी के सफर मे गुजर जाते है”, म्हणत आठवणींच्या गर्तेत घेऊन जातो आणि त्यातून पुन्हा उभारी कशी घ्यावी हे सांगण्यासाठी “रुक जाना नही, तू कही हार के”, असेही अधिकार वाणीने सांगतो. एकंदरीत काय तर किशोर इज ऑल्वेज विथ यु”, हेच तो सतत सांगत राहतो. किशोरचा अलौकिक आवाज सर्वस्पर्शी वाटतो मला. किशोर म्हणजे घरातील एक सदस्य, तो कधी मित्र होतो, कधी प्रेमी, कधी मेंटर तर कधी संयमी मार्गदर्शक, तर कधी गुरु एक ना अनेक रूपात किशोर भेटतो म्हणून तो हक्काचा , आपला वाटतो. कितीही इच्छा असली तरी आज मी किशोरला भेटू नाही शकत पण त्याचां आवाज सतत सोबत करतो, तो येथेच कुठेतरी आहे, रफी साहेबांचे एक गीत आहे, “तू कही आस पास है दोस्त”, अगदी तसेच. खरं तर किशोरदा ने त्याच्यातील लहान मुलास ...

मनातलं

इमेज
            एखादा विषय विचारात रुंजी घालू लागला की जो पर्यन्त तो कागदावर उतरवित नाही तो पर्यन्त चैन पडत नाही. कधी कधी अगदी नवा विषय , नवं तंत्रज्ञान, नवी कल्पना डोक्यात येते तर कधी चालू घडा मोडींवर भाष्य करावं , आपल्याकडील ज्ञान शेअर असा विचार येतो. अशा वेळी पूर्वी अगदी वही पेन घेऊन ते सारे विचार समर्पक , योग्य, सोप्या भाषेत मांडले की आनंद मिळायचा, तोच आनंद आता संगणकावर हे सारं सेव्ह केलं की मिळतो ही गोष्ट स्वाभाविक आहे. इतरां प्रमाणेच सुरुवात फक्त स्वत:च्या आनंदासाठी लिहिणे येथूनच झाली पण जस जसे नवे तंत्रज्ञान शिकू लागलो तस तसे याचे ज्ञान सर्व सामान्यां पर्यन्त पोहोचू शकेल का ? तेही मराठीत त्यांना समजेल अशा भाषेत यावर विचार केला आणि तसे लिहिण्यास सुरुवात केली. कधी एखाद्या तंत्रज्ञानाच्या माहिती साठी विशेष मागणी यायची तर कधी मीच नव्या तंत्रज्ञानाच्या सागरातून निवडक मोती शोधायचो आणि त्याची विशेषत: विषद करायचो. संगणकावर युनिकोड सुरू झाल्यानंतर स्वत:चा ब्लॉग असावा असे विचार येऊ लागले, तसे पाहिले तर युनिकोड मध्ये भारताचा सहभाग हा २००० साली झाला, पण त्याचा प्...

जेन – “झी” आणि सत्तांतर ! त्या पलीकडे

इमेज
  सोशल मीडिया वापरण्यास परवानगी नाकारली हे अनेक कारणांपैकी एक निमित्त असू शकेल पण संपूर्ण देशाची खदखद तरुणाईने बाहेर काढली आणि चक्क सत्तान्तर करून दाखविले. हे सारं एवढं सहज साध्य होण्यासारख आहे असे वर-वर तर वाटत नाही पण घडलं तर तसचं आहे, सोशल मीडिया वापर करण्यावर बंदी आणली म्हणून पूर्ण सत्ता उलथविण्यात अग्रेसर असणारी Gen झी ! पूर्ण इलेक्ट्रोनिक , प्रिंट मिडियाने क्रेडिट याच पिढीस दिले आहे. प्रत्यक्षात भ्रष्टाचार, बेरोजगारी या प्रश्नाना त्रासलेल्या तरुण पिढीने बंड केले आणि सत्तांतर घडवून आणलं. सोशल मीडिया हे फक्त माध्यम नसून एक धारदार शस्त्र आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे हे मात्र नक्की. मी माझ्या करिअर विषयक मार्गदर्शन सेशन मध्ये एक उदाहरण नेहमी देतो , पूर्वी जसे चांदीचा चमचा घेऊन जन्मला आलेला आहेस का? असे म्हंटलं जायचं अगदी तसेच १९९७-२०१२ मध्ये जन्मलेल्या पिढीस “गुगल स्पून” सोबत घेऊन जन्मलेली पिढी म्हणतो, विनोदाचा भाग सोडा, पण या पिढीस इंटरनेट वापर कसा करावा हे खास कुणास शिकवावं लागलं नाही. ही मंडळी त्यांना याचा वापर जसा हवा आहे तसा करण्यात निपुण आहेत. भ्रष्टाचार आणि त्यातून...

आपलं फक्त लक्ष नसतं...

इमेज
  “यु लर्न समथिंग एव्रीडे ईफ यू पे अटेन्शन”, खूप छान कोट आहे, कुण्या थोर विचारवंताचे विचार असावेत. वाचनात आले , मला आवडले. तसे पाहिले तर , खरे ही आहेत हे विचार, तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही काही ना काही शिकताच. नियमच म्हणा फार तर यास. नियमच का? तर नियम हे फार कुणास आवडत नाही, ते कायम नकोशेच वाटतात. म्हणून “नियम”, म्हणतात ना, आपलं फक्त लक्ष नसतं !.  ह्या धाव-पळीच्या जगात कुणास वेळ आहे ओ ! लक्ष द्यायला ? जो तो फक्त पळतो आहे. कुठे? कोणालाच माहिती नाही. मोठ्या शहरात साधारण हे पहायला मिळतं असा माझा गैरसमज होता पण तसे काहीच नाही. आमच्या शहरात देखील हे पाहायला मिळालं. त्यामुळे फारच आश्चर्य वाटू लागलं. तसं पाहिला तर सोलापुरात कुणासही विचारा , काय म्हणता ? कसे आहात? समोरून उत्तर ठरलेलं “काही नाही निवांत”. मग एवढी निवांत असणाऱ्या मंडळीना लक्ष देण्यास काय हरकत आहे? पण तसे होत नाहीच. ही सारी मंडळी देखील बहुधा नाकासमोर चालत असावीत. तसे पाहिलं तर विषय खूप साधा-सरळ आहे, आपल्या अवती भवती घडणाऱ्या गोष्टी कडे थोडसं लक्ष द्यायचं. म्हणजे नक्की काय करायचं ?असा प्रश्न देखील काही मंडळीना नक्की...

राजेश खन्ना – बॉलीवुडस् फर्स्ट सुपरस्टार

इमेज
  “पुष्पा”, आय हेट टिअर्स”, “अमर प्रेम” चित्रपटातील फेसम डायलॉग ! जितक्या सहजतेने राजेश खन्ना यांना हे साध्य झालं आहे ती क्वचितच कुणास जमलं असतं, ती एक राजेश यांची स्टाइलच होती. मी एक डाय-हार्ट अमिताभ बच्चन फॅन आहे पण आज राजेश खन्ना यांच्या विषयी लिहितो आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे काही अप्रतिम चित्रपट ! अनेक फॅन्सच्या काळजाचा ठेका चुकवेल अशाच स्टाइल राजेश मिरवीत असतं. स्टारडम काय असतं आणि ते कॅरि करणं हे सारं बॉलीवुडने प्रथम अनुभवलं ते राजेश खन्ना यांच्या मुळेच ! सलग १५ चित्रपट सुपरहिट ! असा रेकॉर्ड देखील राजेश यांचेच नावे आहे. आणि अद्याप त्याची बरोबरी करण्यात कोणत्याच कलाकारास यश मिळालेलं नाही. राजेश यांच्या पूर्वी देखील स्टार होते, पण राजेश यांनी तो काळ गाजवला ! युवतींनी रक्तरंजित पत्रं प्रथम याच कलाकारास लिहिली गेली असं वाचण्यात आहे. चित्रपटास उत्तम संगीत, किशोरचा सदाबहार आवाज साथीला, नव कथानक आणि सहज अभिनयाच्या जोरावर राजेश यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. राजेश यांच सुरुवातीच्या काळातील अनेक चित्रपट एका पेक्षा एक आहेत पण सदैव लक्षात राहिलेले सदाबहार अभिनयाने नटलेले म्हणाल त...

आनंदचा ‘मुरारीलाल’

इमेज
  “मुरारीलाल”, हे नाव कानावर पडताच डोळ्यासमोर कोण येतं? तुम्ही म्हणाल “आनंद” चित्रपटातील जॉनी वॉकर, खरं ही आहे ते वॉकर यांनी ती भूमिका बजावली नव्हती तर ते ती भूमिका जगले होते. पण राजेश खन्नास प्रतिसाद देणारे इसाभाई सुरतवाला हे पात्र त्यांनी निभावलं होतं. मुरारीलाल पात्र आपल्या समोर उभं करण्यात जॉनी वॉकर यशस्वी झाले, असेच मी म्हणेन. साद असेल तर प्रतिसाद हा प्रकृतीचा नियम पण तो सर्वानाच माहिती असतोच असे नाही. चित्रपटात एखादा दुर्धर आजार सोबत घेऊन फिरणारा, केवळ सहा महिने आयुष्य असणारा आनंद ! अनेकांना साद घालत फिरतो पण कुणीतरी एकच त्यास प्रतिसाद देतो. असेच साद घालत फिरणारा आनंद   तर आपल्या अवती भवती सुद्धा तुम्हाला   भेटत असतील. दिलखुलास आयुष्य जगणारे आनंद, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे, आयुष्य नितांत सुंदर आहे आणि ते भर भरून जगायला हवं म्हणून कृतीतून शिकविणारे आनंद ! एक नाव पण अनेक रूपं धारण करणारे आनंद ! तुम्हाला असा एखादा आनंद भेटला आहे का ? माझी रोज सकाळी अशाच एका “आनंदची” भेट होते. एक मित्र म्हणून नक्कीच रोज भेटावा असाच हा आनंद ! मॉर्निंग वॉक दरम्यान, प्रचंड ऊर्...