ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

HCL चा टेक-बी ट्रेनिंग प्रोग्राम



HCL या सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रेसर कंपनीने रोजगार उपलब्धी मध्ये खुप महत्वपूर्ण असे पाऊल टाकले आहे. HCL ने मदुराई येथे १०+२ विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. भारत सरकारच्या स्कील इंडिया मध्ये याचे योगदान मानले जाते आहे. भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार केंद्र शासन कौशल्य विकासावर(स्कील इंडिया) आपले लक्ष केंद्रित करीत असताना खाजगी क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीने देखील यात योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचे खरच कौतुक करण्यासारखे आहे. कौशल्य विकास साधता आल्यास विद्यार्थ्यास रोजगार उपलब्धी तर होईलच सोबत विद्यार्थ्याकडे स्वयं-रोजगार सुरु करण्याची संधी उपलब्ध असेल ज्यामुळे त्यास पैसे कमविणे सहज शक्य होईल. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार अनेक तज्ञ मंडळींच्या हस्ते विविध कोर्सेस सादर करीत आहेत. या प्रकल्पा अंतर्गत उमेदवारास त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येवू शकते.बऱ्याच वेळा कौशल्य असते परंतु रोजगार उपलब्धी होत नाही तर कधी रोजगार उपलब्धी असते पण उमेदाराकडे कौशल्य नसते अगदी हेच या योजनेंतर्गत केंद्र सरकार बारकाईने पहात आहे.
          अगदी हाच धागा धरून HCL सारख्या  सॉफ्टवेअर क्षेत्रातील मधील मोठ्या कंपनीने १०+२ उत्तीर्ण मदुराई व जवळपासच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. मदुराई येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नौकरीसाठी शहर सोडावे लागू नये हा हेतू देखील या मागे दडला असावा. या टेक बी कार्यक्रमात विद्यार्थी तांत्रिक दृष्ट्या तसेच व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य हेतू आहे. सॉफ्टवेअरचे प्रगत ज्ञान घेता घेता विद्यार्थी मास्टर प्रोग्राम ला देखील रजिस्टर करू शकतो. ज्या विद्यार्थ्याना १२ वी मध्ये ८०% पेक्षा जास्त गुण (CBSE विद्यार्थ्यांसाठी) तर ७०% पेक्षा जास्त गुण(स्टेट बोर्ड) व गणित विषय शिकलेला असणं आवश्यक असे विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत.विद्यार्थ्यांची निवड हि चाचणी द्वारे तसेच अॅप्टीट्युड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्युव द्वारे केली जाते. HCL चा हा प्रयत्न नक्कीच विद्यार्थ्याना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास प्रेरणा देणारा आणि सोबत उच्च शिक्षण देणारा ठरेल असा विश्वास वाटतो.

अमित कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?