ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

‘अहंकार’ हा सोडूनी द्यावा

 लहान मुले म्हणजे देवा घरची फुले म्हणतातते उगीच नाहीलहान मुलांमध्ये जी निरागसता असते ती आहे तशीच राहत नाही व्यक्ती मोठा होईल तसे हि लोप पावत जाते आणि त्याची जागा “इगो” अर्थात अहंकाराने व्यापली जाते. हा “इगो” कुठेच थारा लागू देत नाही पण माणूस त्यास खूप जपतो. लहान मुलं भांडतात पण लागलीच दोस्तीही होते तसे मोठ्यांचे होते कायाचे उत्तर नकारार्थीच मिळतेअसे होण्याचे कारण “इगो”, हा भावच मुळी लागलीच विचार व्यापून टाकतोमाणसास दुसरे काही सुचतंच नाही असे म्हणा हवे तरमग हा “इगो” घेवून माणूस जिकडे जाईल तिकडे मिरवीत असतोसमर्थांनी दास बोधात कुविद्या लक्षण सांगताना दुसऱ्या दशकातील तिसऱ्या समासात गर्व, ताठा, अहंकार यांचा उल्लेख केला आहे आणि यापासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला दिला आहे. याकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे जे जे सोडून देण्यास सांगितले आहे ते ते मनुष्यप्राणी अगदी घट्ट धरून ठेवतो आणि त्याचा त्रास स्वत:ला करून घेतो (अपवाद वगळता).

मला वाटतं “इगोच वर्गीकरण करावंहे वर्गीकरण करताना त्यास सामोरे कसे जावे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकदा का आपणांस हे लक्षात आलं कि यास सामोरे कसे जावे तर तो सांभाळणे सोईचे होईल आणि त्यामुळे नाती तुटण्यास प्रतिबंध होईल. अर्थात असा प्रयत्न सर्वांनी करून पाहणे इष्ट होईल तरच सुफळ संपूर्ण म्हणता येईल. काय करावं तर “इगो” ला तीन प्रकारात विभागावंपहिला प्रकार प्रौढदुसरा “पालक, आणि तिसरा “छोटसं मुल” असे केल्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतील असे वाटते. एक महत्वाचं म्हणजे रिलेशन्सची जपणूक होण्यास त्याचा फायदा होईल.

प्रौढ अर्थात अॅडल्ट इगोया प्रकारा मध्ये शब्दाला शब्द लागतो आणि वाद होतोकारण दोघेही “इगोला सांभाळणारेच असतातकुणी माघार घ्यायची हा मोठा प्रश्न असतोत्यामुळे या प्रकारात वाद वाढण्याची जास्त शक्यता असते. “तू खूप शहाणा आहेस”, रवि राजेश ला म्हणालायावर राजेश लागलीच उत्तर देतो, “आहेच शहाणातुझ्यासारखा नाही,” यावर रवि म्हणतो,माझ्यासारखा म्हणजेकाय म्हणायचं आहे तुलास्पष्ट बोलआणि संवादाचे वादात कधी रुपांतर होते हे दोघांनाही समजत देखील नाही. हे टाळण शक्य आहे कातर होत्या अगोदर पुढील इगो चे प्रकार पाहूयात.


पॅरेंट इगो पालकत्वाची भावना असणारा हा इगो प्रकार. या प्रकारात एक व्यक्त होतो आणि दुसरा हा फक्त ऐकण्याच्या मनस्थितीत असतोपहिला त्याच्या भावना व्यक्त करीत असतो पण दुसरा त्याच्या कोणत्याही विषयावर व्यक्त होत नाहीतो फक्त ऐकत असतो. या मध्ये वाद वाढण्याची शक्यता फार कमी असतेकारण भांड्याला भांड लागत नाहीशांतसंयमी पालकत्व एकाने स्विकारायची तयारी ठेवायची गरज या प्रकारात जास्त असते. मिनल आईला म्हणते “काय ग आईतुला किती वेळा सांगितले कि माझी रूम आवरू नको म्हणूनतरी तू काय आवरतेस ?”, यावर मिनल ची आई काहीच व्यक्त होत नाही उलट मिनल मात्र आईने रूम आवरलेली आवडलेली नसल्याने राग राग करून तिचे मन मोकळे करते.

चाईल्ड इगो अर्थात छोटसं मुल या प्रकारात रममाण होणं. हा प्रकार सर्वात सुरक्षित असा आहे. या प्रकारात कोणत्याही प्रकारचे वाद होणं जवळ जवळ अशक्यच ! कारण या प्रकारात निरागसता आहेबालपण जपत संवाद आहेम्हणून हा प्रकार सर्वात सुरक्षित. बालदिनी आपण सर्वांनी याच इगो मध्ये आयुष्य एन्जॉय करणं मला श्रेयस्कर वाटतं. रमेश म्हणाला “काय मॅच झाली कालकाय सुंदर खेळला विराट”, यावर महेश म्हणतो, “फुटबॉल मॅच ना ?”, खरच मस्त झाली मॅच!! यावर हशा पिकू शकतो , हो ना?

हे प्रातिनिधिक प्रकार मी मांडले आहेतया तिन्ही प्रकारात आपण आपलं कसंब लावून लिलया वावरू शकतो. ज्यावेळी जो प्रकार योग्य वाटेल त्यावेळी तो प्रकार वापरावा म्हणजे रिलेशन्स ची जपवणूक होईलवादतंटेनिर्माण होणे टाळता येवू शकेलआणि हो जीवनाचा आनंद लुटता येवू शकेल.  

 

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

टीप: या लेखाचा सध्या सुरु असलेल्या घडामोडींशी कोणताही संबंध नाहीतो तुम्ही लावल्यास आणि चपखल लागल्यास त्यास निव्वळ योगायोग समजावा.      

तळटीप : तुम्हास कोणत्या इगो मध्ये रहायला आवडेल ? कमेंट करा आणि मला सांगा.

 मुख्यपृष्ठ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?