पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

संत श्री ज्ञानेश्वर – मुक्ताई

इमेज
  सध्याच युग हे आर्टिफिशियल इंटेलिजंसच युग, जिथे ड्रायवरलेस कार आल्या आहेत, अशा जमान्यात दिग्दर्शकाने “भिंत” चाललेली दाखवणं कितपत रुचेल हा खरा प्रश्नच ! पण तरीही दीगपाल लांजेकर आणि टीम ने हे धाडस केलं आणि १४०० वर्षे वयोमान !! असणाऱ्या योगींच्या स्वागताला सामोरं जाण्यासाठी संत श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. हे सारं दिव्यच ! या दिव्यत्वाची महती आणि माहिती नव्या पिढीस होणे नितांत आवश्यक आहे. वाचन आणि संयम कमी होत चाललेल्या युवा पिढीस हा विषय पडद्यावर दाखवणं आणि चित्रपट गृहात आणणं हे एक आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक वारसा जपणं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं मला कौतुकास्पद वाटतं.   हे एक दिग्दर्शक निर्माते म्हणून आपण जाणलं आणि कशाचीही पर्वा न करता हे आपण पडद्यावर साकारलं. यासाठी प्रथम आपले मन:पूर्वक आभार ! श्रद्धा ,भक्ति आणि नम्रता या जोरावर अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात याचे दर्शन या चित्रपटात होते. अहंकारामुळे होणारे नुकसान सामान्य जनास दिसत नाही, पण भक्ति मार्गावर असणाऱ्या मंडळीना हे सारं ज्ञात असतं. बदलत्या काळा नुसार बदलणे क्रमप्राप्त असतं तसं बदलाव...

सोशल मीडिया एटीकेट्स !

इमेज
  हा एक नवा माहिती देण्याचा , जागो रे ! म्हणण्याचा विषय होवू शकतो, असं वाटलं नव्हतं. पण सोशल मीडियाचा वापर करीत असताना आज ज्या प्रकारे कमेन्टस् वाचण्यात येतात, त्या वाचल्यावर नक्की वाटतं की याचं शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. काही मंडळी त्वेषाने द्वेष पसरविण्यात एवढी मग्न असतात की खरचं यांची शैक्षणिक पात्रता, विषयातील अभ्यास या विषयी कुतूहल निर्माण होतं. अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेलगाम घोडा दवडणे होऊ शकत नाही. ताळतम्य हवच, एखाद्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा, ज्ञानाचा आदर होताना दिसतं नाही. ही आपली संस्कृती नाही. सोशल मिडियावरील मंडळी शिक्षित आहेत पण साक्षर नाहीत हे नक्की. या विषयावर माझा ब्लॉग आहेच, तुम्ही तो वाचला असेल अशी आशा व्यक्त करतो. नसेल वाचला तर या लिंकवर क्लिक ( https://amitkamatkar.blogspot.com/ 2025/03/ educate-literate.html ) करून  नक्की वाचावा. सोशल मिडियाचा वापर तसा अनेक वर्षे झाली करतो आहे. हा वापर करीत असताना शिष्टाचारांच (इंग्लिश मध्ये एटीकेट्स) पालन करणं यां विषयी कधी फारसं कुणी बोलेललं पाहिलं नाही अथवा कुणी यावर मार्गदर्शन केलं आहे असेही पाहिलं नाही. माझ...

तुम्ही शिक्षित की साक्षर ?

इमेज
  शिक्षण म्हणजे नक्की काय? फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण की सुज्ञ, सुसंस्कृत होणं म्हणजे शिक्षण की नैतिकता आंगीकरण्याचं बळ मिळणं म्हणजे शिक्षण की  फक्त प्रश्न विचारणं म्हणजे शिक्षण ? पूर्वीच्या काळी एकच समाज शिक्षित होता त्यामुळे लिखा पढी , सरकारी दरबारी त्यांचाच रुतबा असायचा असे थोर इतिहासकार, समाजसुधारक यांनी लिहून ठेवलं आहे . १८१३ मध्ये ब्रिटिश सरकारने अर्थात राणी ने ईस्ट इंडिया कंपनीस शिक्षणात कंपनीची भूमिका असावी असे आदेश दिले आणि यासाठी सुमारे एक लाखांची तरतूद करण्यात आली. अशी तरतूद असण्याची ब्रिटिश सत्ताक भारता साठी ही पहिलीच वेळ. परिणामी स्थानिकांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीस देण्यात आली. पुरोगामी भारतीय मंडळीनी इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारास अनुकूलता दर्शविली. याच दरम्यान राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता, मद्रास, येथे संस्कृत महाविद्यालय आणि बंगाल मध्ये प्राच्य महाविद्यालये स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला. यावर प्रशासनाने इंग्रजी आणि आशिआई भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. साधारण १८१७ मध्ये प्रगतिशील बं...

“छावा” च्या निमित्ताने .....

इमेज
  इतिहासातील विविध विषय समजून घेणे , अधिक माहिती घेण्याचा, मिळविण्याचा प्रयत्न करणे ही आवडच, याच आवडीतून इतिहास समजून घेऊन त्याची माहिती इतरांना देणे, हा पण एक छंदच. नुकताच “छावा” चित्रपट प्रदर्शित झाला, आणि जी त्रोटक माहिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वाचली होती, ती अधिक समजून घेण्या विषयी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मग कादंबरी वाचन असेल, अथवा ऑनलाइन संकलन असेल. ऑनलाइन ! म्हंटल की भुवया उंचावल्या जाऊ शकतात, कारण तेथील उपलब्ध माहितीच्या सत्यतेवर   शंका घेतली जाऊ शकते. विकिपीडिया सारखे माध्यम ज्यात कुणीही बदल करू शकतं . ते किती सत्य माहिती देऊ करतं हा अभ्यासाचा विषय , म्हणून स्पष्ट पणे नमूद केलं की सत्यतेवर सिद्ध होऊ शकेल अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो खरा पण अद्याप “ज्ञानाची (छत्रपती संभाजी महाराज   समजून घेण्याची ) भूक” काही शमली नाही. “संभाजी” या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची एक नवी विडिओ बाइट पाहिली त्यात इतिहासातील कोणत्या लेखनाची विश्वासार्हता अधिक या विषयी माहिती दिली आहे. शुद्ध ऐतिहासिक लेखन महत्वाचं. कुणा...

वारसा जपणं आम्हाला झेपेल का ?

इमेज
  काही इतिहासकार (?) “छावा” चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून एवढे बेचैन झाले आहेत की राजे , औरंग च्या हाती लागले , पकडले गेले त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या तरी राजेंनी शरणागती पत्करली नाही, धर्माभिमान जागृत ठेवला पुढील पिढीस हाच धर्माभिमान कायम प्रेरणा देत राहिला आणि राहील यात शंकाच नसावी. हे सारं महत्वाचं राहीलच नाही, फितुरी कुणी केली ? त्याची जात काय होती? या साऱ्या गोष्टीत जात कशी घुसडता येईल हे महत्वाचं. दुर्दैव आहे !! ३३६ वर्ष झाली अजूनही छत्रपती संभाजी महाराज काय होते हे समजून घेताना जाती पातीवरून ए आय च्या युगात सोशल मीडिया रंगवणं सुरू आहे. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास समजून घेणं , पुढील पिढीस तो सांगणं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे विसरून चालणार नाही.   काही इतिहासकार (ब्राह्मण नसलेले) ज्यांनी संशोधन केलं आणि पुस्तकं लिहिली, छत्रपती संभाजी महाराज सर्वाना समजावेत यासाठी परिश्रम घेतले अशी सारी मंडळी सांगतात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरी मुळे राजे, औरंगच्या हाती सापडले... पण एक रील अचानक छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फिरतं आहे, त्यात कुणी फ्रेंचचा र...

छावा

इमेज
  आईचं प्रेम हे महत्वाचं असतच, ज्यास ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, असचं असतं. बालपणात तर सर्वात जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने जर कुणाची आई हिरावून नेली तर, हा विचार देखील करवत नाही. ज्यांना ह्या दू:खातून जावं लागलं ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. अगदी हेच आपल्याला लक्ष्मण उतेकर यांच्या “छावा” मध्ये पहायला मिळेल. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला सोस आला असा हा सिंहाचा छावा आयुष्यात प्रत्येक आघाडीवर झुंझत राहिला, पण त्याने कधीही हार मानली नाही. खरं तर तीन तासांच्या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना  जाणून घेणं केवळ अशक्य पण उतेकर यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. स्व. शिवाजी सावंत यांनी ८८६ पृष्ठ संख्या असलेल्या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज मांडण्याचा , समजावून सांगण्याचा, रणधुरंधराची कथा आजही इतिहासाची साक्ष देते आहे. अवघं बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला राजा पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाई करणारा लढवय्या सेनानी म्हणून ज्य...

अनसीन स्टेप्स : बिहाइंड सक्सेस

इमेज
अनसीन स्टेप्स : बिहाइंड एव्री सक्सेस   जीवनातील आव्हानं ही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांना स्विकारा आणि तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घ्या. यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास हवाच. मला वाटतं स्वप्न पाहणे ही एक सुरुवात असते, ती साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यकच असतात. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवा. असे प्रेरक विचार आपण वाचतो आणि त्याप्रमाणे आयुष्यात मार्गस्थ राहण्याचा निर्धार ही करतो. प्रवास कोणताही असो तो तुम्ही एन्जॉय करता की नाही यावर बरचं काही अवलंबून असतं, आयुष्याचा प्रवास असो अथवा शैक्षणिक, व्यावसायिक असो, तुमची एन्जॉयमेंट मॅटर्स ! तसे पाहिलं तर आमच्या कामतकरांकडे व्यवसाय करणारा मीच पहिला ! त्यामुळे जमेल का? स्थैर्य मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न, व्यवसाय कसा करावा याचं बाळकडू मिळालेलं आहे का? तर अजिबात नाही, पण मनात निश्चय पक्का , प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी सोबतच बाबा-आईचं मनोबल, पाठीशी आशीर्वाद, माझी बहीण आणि माझा विवाह झाल्यानंतर पत्नी यांच्या प्रेरणे मुळे, भक्कम पाठिंब्या मुळे व्यवसाय करणं मी शिकत राहिलो आणि आजही शिकतो...

एआय शिक्षकांची जागा घेईल ?

इमेज
   “माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे “हात” धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, हा संदेश कदाचित तुम्ही देखील वाचला असेल, आताच युग हे एआय (आर्टिफिश्यल इंटेलिजेंसच) युग, बऱ्याच गोष्टी एआय मुळे बदलत आहेत. पण खरच एआय शिक्षकांची जागा घेऊ शकेल? हा प्रश्न बरेच दिवस मनात घोळतो आहे, कारण पहा “जनरेटीव एआय” ने खूप कमाल केली आहे. एका कंपनीचे अथवा स्वत:चे प्रॉफिट लॉस शिट वाचण्याचे तंत्र प्रत्येकास आत्मसात असतेच असे नाही, आता जनरेटीव एआयला हा प्रश्न विचारला तर लागलीच पूर्ण प्रॉफिट लॉस शिट एआय समजावून सांगेल. तेही काही क्षणात आणि अगदी तुम्ही म्हणाल त्या भाषेत !! मग ही कमालच म्हणावी लागेल. अगदी ह्याच प्रकारे कायदेशीर, वैद्यकीय सल्ला देखील एआय देऊ करीत आहे. अर्थात त्याच्याकडील डेटाच्या आधारेच हे सारं सुरू आहे. माणसाने मशीन्सना पुरविलेल्या माहितीच्या आधारे अनेक अचंबित करणारे निकाल एआय देऊ करीत आहे. काही ठिकाणची जॉब्स जातील तर काही जॉब्स नव्याने तयार होतील. जॉबची नावे बदलतील या साऱ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत हे नक्की ! आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंटेरनेटच्या मायाजाळात माहिती सह...