सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड
जिथे आपल्या भावना अलगद गुंतत जातात , तिथे नकळत एक नातं आकार घेतं. त्या नात्याला श्वास घेण्यासाठी मनुष्याचंच अस्तित्व आवश्यक असतं असं नाही. कधी एखादी निर्जीव वस्तूही आपल्या भावविश्वात स्थान मिळवते. तिच्याशी शब्दांविना संवाद साधला जातो , आठवणी गुंफल्या जातात आणि हळूहळू ती आपल्या मनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणूनच भावनांना स्पर्श झाला की नातं निर्माण होणं अटळ ठरतं—ते जिवंत असो वा निर्जीव , नातं मात्र तितकंच खरं असतं. आता हेच पहा ना, १९२२ साली ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला एक पूल , त्याच्याशी एक सोलापूरकर म्हणून काय नातं असू शकतं? म्हंटल तर काहीच नाही, अथवा अनेक आठवणी या सोबत जोडलेल्या असू शकतात. सोलापूरकरांनी अनेक वेळा त्याचां वापर केला, पण कालपरत्वे पूलाची कालमर्यादा संपली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल पाडावा लागणे साहजिकच आहे. आता जमाना सोशल मिडियाचा आहे, या पुलाच्या कार्यकाळात म्हणजे १०३ वर्षात त्यास जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी अवघ्या काही दिवसांत मिळाली. तिथे पूल आहे, ज्याचा वापर आपण करीत आलो आहोत हे देखील सोशल मीडियाने अधोरेखित केले. पूल पाडण्याच्या काही दिव...