पोस्ट्स

ई.व्ही.एम.- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन

इमेज
ई.व्ही.एम. अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन भारतात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (हैदराबाद) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बंगळूरू) ने तयार केलेली हि मशीन जिच्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. अशी मशीन साधारण १९९० साली तयार करण्यात आली आणि नंतर १९९८ ते २००१ दरम्यान   टप्प्या टप्प्याने आणि २००४ लोकसभा आणि सर्व साधारण निवडणुकामध्ये वापरण्यात आली. या मशीन ची विविध स्तरावर चाचणी घेवूनच याचा वापर सुरु करण्यात आला हे महत्वाचे ! हे मशीन वापरात येण्या अगोदर बॅलेट पेपर वापरला जायचा हे आपण जाणताच, बॅलेट पेपरच्या वापर (ज्यामध्ये फसवे मतदान, बूथ कॅप्चरिंग करणे सहज शक्य होते) करण्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर या मशीन्स चा वापर सुरु करण्याचा विचार निवडणूक आयोगाने घेतला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. बूथ कॅप्चरिंग करून मतदान करणे या बाबी कशा व्हायच्या याचा अभ्यास करणे अथवा त्यावर विचार व्यक्त करणे आवश्यक नाही, पण हे व्हायचे म्हणून आयोगाने हा निर्णय घेतला. एक मत देण्यास लागणारा वेळ ई.व्ही.एम. ने ठराविक केला त्यामुळे एका मिनिटात फक्त पाच मते रेकॉर्ड केली जातात. या बाबी मुळे मतदान प्रक्रिये...

फोनोग्राफ ते एम.पी.थ्री प्लेअर्स प्रवास - संगीत प्रेमींसाठी यादों का सफर

इमेज
संगीत हा मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक, संगीता शिवाय आयुष्यच विचार करता येवू शकत नाही. हे संगीत रेकॉर्ड स्वरूपात आज आपण ऐकतो, वापरतो यामध्ये अनेक स्थित्यंतर अनुभवास आली आहेत. आज अगदी सहज पणे स्मार्ट फोनवर स्वत:चा आवाज रेकॉर्ड करू शकतो पण स्वत:चा आवाज रेकॉर्ड (ध्वनीमुद्रण) करणं आणि परत तो ऐकणं हि एक प्रकारची जादूचं ! हि जादुची अनुभूती सर्वप्रथम थॉमस एडिसन ने १८७७ मध्ये जगास करून दिली. पहिला फोनोग्राफ याच साली तयार झाला याचं प्रात्यक्षिक दाखवायला एडिसन यांना व्हाईट हाउस मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. (माहिती स्त्रोत: इंटरनेट).फोनोग्राफ वर एकदाच ध्वनीमुद्रण व्हायचे,फोनोग्राफ च्या १० वर्षानंतर एमिल बर्लिनर याने ग्रामोफोन ची निर्मिती केली. आणि साधारण १९०० मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामोफोन ची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९०६ मध्ये व्हिक्ट्रोला मॉडेल, १९०८ साली डबल साईडेड रेकॉर्ड, १९२४ साली इलेक्ट्रीकल रेकॉर्ड आणि त्या नंतर १९४८ साली   एल.पी. (लॉंग प्लेयिंग रेकॉर्ड)- बॉलीवूड मध्ये याचा उपयोग होवू लागला, १९६२ साली मल्टी ट्रॅक अॅनालॉग रेकॉर्डिंग, १९६३ साली फिलिप्स या कं...

जय श्रीराम

इमेज
मी २०१९ मध्ये लिहिलेला हा लेख आज पुन्हा शेअर करीत आहे कारण नुकतीच “वंदे भारत लोकार्पण कार्यक्रमावेळी मा. मुख्यमंत्री यांना "श्रीराम" जयघोष खटकला !! अशीच घटना मागे २०१९ मध्ये तिथेच घडली आणि २०१५ ची आठवण झाली. त्यावेळी म्हणे भारतात असहिष्णुता वाढली होती , म्हणून पुरस्कार वापसी ची लाट आली होती. निमित्त होते मोदी सरकार च्या पहिल्या इनिंग ची सुरुवात आणि कमजोर विरोधी पक्ष ! सुरुवात झाली ती   कन्नड़़ लेखक एम.एम. कलबुर्गी   यांच्या हत्येने आणि मग एकाच वेळी ४० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले मग बॉलीवूड मधील काही मंडळी पुढे आली आणि म्हणाली “भारत सुरक्षित देश नाही” , आणि बरचं काही यावर विविध न्यूज चॅनल्सवर चर्चा , वादाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या , संसदेत देखील यावर चर्चा झाली आणि बराच धुराळा उडाला !! हा विषय एवढा वाढला होता कि पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना ब्रिटन च्या पंतप्रधानानी या विषयी मोदिंसोबत असहिष्णुते बद्दल चर्चा करावी या विषयी या मान्यवर लेखकांनी पत्र व्यवहार देखील केला होता. साहित्य अकादमी चे माजी अध्यक्ष श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या ११ ऑगस्ट २०१८ च्या लेखाच...

टी.आर.पी. साठी काही पण – आमचा मात्र निषेध !!

इमेज
आजकाल विविध न्यूज वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार ( त्यांच्या लेखी ) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल, पण हल्ली विविध प्रकारचे विशेष शो चालविले जातात ज्यामध्ये चालू घडामोडी वर मान्यवर व्यक्तींचे मत त्यावर चर्चा (नावालाच- खरं तर ती भांडणं वाटतात) पण अशा शोज ना भरपूर मागणी असल्याने विविध न्यूज चॅनल्स ची यामध्ये स्पर्धा सुरु आहे अस दिसतं. हि स्पर्धा एवढी भयंकर आहे कि त्यासाठी हि मंडळी काहीही करू शकतात याचा प्रत्यय वारंवार येतो. चॅनल्स च्या मालक मंडळीना यात पैसा दिसत असतो आणि शो च्या सूत्रधारास स्वत:ची प्रसिद्धी दिसत असते, या प्रसिद्धी पायी कोणत्याही विषयावर अकलेचे तारे तोडण्यास हि मंडळी तयार असतात असचं चित्र बऱ्याचदा दिसतं. देशभक्ती आणि देशाची काळजी असेल तर ती फक्त या मंडळींनाच !! दुसऱ्यांना उघडा डोळे म्हणत बऱ्याच विषयांवर सूत्रधार त्याचे ज्ञान पाझळताना दिस...

मैं शायर बदनाम

इमेज
१९७३ साली नमक हराम हा हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट अनेक कारणांनी हिट नव्हे सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील अमिताभ यांच्या अँग्री यंग मॅन च्या छबीने प्रेक्षकांच्या हृदयातील स्थान अधिक भक्कम केले होते. लीड रोल ला काकाजी होते पण बच्चन साहेब भाव खाऊन गेले, अनेक दृश्यांमध्ये हे प्रकर्षाने पहायला मिळते, हा संवाद, “कौन है वो माय का लाल जो अपनी मां का दुध आजमाना चाहता है ?” म्हणणारा अमिताभ (चित्रपटातील विकी) कुणी विसरला असेल तर नवलचं ! या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्याचं गीत आणि संगीत, हि जबाबदारी आनंद बक्षी आणि पंचम दा नी अगदी उत्तमप्रकारे सांभाळली आहे. नदिया से दरिया, दिये जलते है आणि मै शायर बदनाम हि काही गाणी आजही अगदी एव्हरग्रीन वाटतात, अर्थात या मध्ये किशोर यांचा जादुई आवाज मोलाची भूमिका पार पाडतो यात शंकाच नाही. सर्व गीतांमध्ये गीतकाराचे अनन्य साधारण असे योगदान आहे कारण जे जादुई अर्थपूर्ण शब्द आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत त्यास तोडच नाही, गीताच्या शब्दांमध्ये दडलेला अर्थ उलगडायचा प्रयत्न केला तर नव-नवीन अर्थांची क्षितिजं पादाक्रांत केल्याचा आनंद मिळतो. आता हेच पहा ...

सावधान – हि तर धोक्याची घंटा

इमेज
सुजाण पालकत्व- टेक २ साहिल चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सोलापुरात झाल , नुकतीच बारावी झाली आता पुढील शिक्षण कुठे घ्यायचे या विषयी घरात खल सुरु झाला , आणि शेवटी ठरलं "विद्येच्या माहेर घरी" म्हणजे पुण्यात शिक्षण पूर्ण करायचं त्याप्रमाणे साहिल ला पुणे येथे शिक्षणास ठेवले. साहिल ने मन लावून अभ्यास केला परंतु पदवी शिक्षण होई पर्यन्त त्याचे प्रयत्न कमी पडले , आणि YD हा नविन शिक्का त्याच्या बायोडेटा वर पडला. YD (ईयर डाऊन अस काहीतरी मुल म्हणतात) असताना गावी परत आला , स्वगृही दिवस मजेत जात होते , त्यास भविष्याची फारशी चिंता नव्हती , आई आणि वडील दोघेही उच्च पदस्थ अधिकारी , घरात कोणत्याच गोष्टी ची कमतरता नव्हती. सगळं अगदी भरभरुन !! साहिल ने त्याचे पदवी (आजकाल पदवी म्हणालं कि इंजीनिअरिंग च बर का !) शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातच एका कंपनीत नोकरीस लागला. सगळ कसं अगदी मनासारखं ! आई-बापास अजुन काय हवं ? आपलं लेकरु आयुष्यात सेटल होत आहे हे पाहुन साहिल चे आई   वडील आनंदुन जायचे , पण काही दिवसातच साहिल ची कुरकुर सुरु झाली , साहेब असेच आहेत , ते सारखं असंच करतात , तसंच करतात , ऑफि...

माईल्स टू गो बिफोर आय स्लीप

इमेज
    The woods are lovely, dark and deep,       But I have promises to keep,       And miles to go before I sleep अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या “स्टॉपिंग बाय वूड्स” या कवितेतील या ओळी प्रेरणा देतात असं वाटतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट   यास प्रवासात सहज सुचलेलं हे काव्य खूप साध आहे पण शेवटच्या चार ओळीं मध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. जो खरोखरी प्रेरणादायी आहे. दोन दिवसापूर्वी कामानिमित्त बाहेर पडलो होतो त्यावेळी एफ.एम. वर (कार मध्ये) प्रसिद्ध शो सुरु होता त्यामध्ये निवेदकाने या कवितेचा उल्लेख केला आणि काही काळा साठी मी भूतकाळात गेलो. या ओळी सर्वप्रथम मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नावाने तयार केलेल्या कॅलेंडर वर पाहिल्या, वाचल्या होत्या, आणि त्याच दिवशी या ओळीनी हृदयात घर केलं होत. आयुष्यात प्रेरणा घेण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही, लागते ती फक्त इच्छाशक्ती, ती असली कि झालं, आणि आपण हि त्यादिशेने वाटचाल सुरु करतो.                     कवी रॉबर्ट प्रव...