पोस्ट्स

मोह

इमेज
  शून्य अवस्था काय असते ? कधी अनुभवली आहे का? माणूस काहीच निर्णय घेऊ शकत नाही अथवा काहीच सुचत नाही (अंधकार पसरतो) अशा अवस्थेस मी शून्यावस्था म्हणतो. माणूस देवळात जातो आणि काही ना काही तरी त्या देवाकडे मागतो, प्रत्येकवेळी तो काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो कधीच देवाला भेटायला जात नाही, अर्थात ज्याच्याकडे श्रद्धा, भक्ति आहे तोच हा खटाटोप करतो- कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. भगवद् गीते मध्ये सांगितले आहे, आत्मिक संपत्ती हीच स्थिर, शाश्वत संपत्ती आहे, तिच्यात जो दोष निर्माण करतो तो “मोह”. “मोह” हा कुणाला चुकलाय ? सगळे ‘या’ मोह पाषात अडकून राहतातच, फक्त जेंव्हा आत्मा नश्वर शरीराचा त्याग करतो तेंव्हाच हा मोह सुटतो , मोह असतो तो पर्यन्त प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. अनंताच्या प्रवासाला जाणारी मंडळी देखील यापासून परावृत्त असतात म्हणूनच त्यांना मोहत्याग करता येतो अस काहीतरी असावं, मी काही यातील तज्ञ नाही त्यामुळे ठोस मत व्यक्त करू शकत नाही, पण अनुभवा आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे,एवढचं. गीते मध्ये व्याधींचे मूळ म्हणजे ‘मोह’ ,असे सांगितले आहे. मनुष्य...

पल पल दिल के पास – एक मास्टरपीस

इमेज
  संगीतकार कल्याणजी-आनंदजी , गीतकार राजेंद्रकृष्ण आणि किशोरदांच ऑल टाईम हिट गाणं , सगळ्यांच फेव्हरीट गाणं अशी ज्या गाण्याची ओळख सांगता असं गाणं म्हणजे “पल पल दिल के पास” , प्रत्येकाच्या ओठावर असणारं गाणं आणि तितकच “दिल के पास” सुद्धा असणारं , गाण्याची सुरुवात ज्याप्रकारे चित्रित केली आहे , त्यास त्याकाळी (मला वाटत सध्या देखील) तोडच नाही , राखी जी पत्र हातात धरून वाचत आहेत आणि धरमपाजी पत्रातून गाणं (नायिकेची कल्पना) म्हणत आहेत. जणू काही पत्रात तोच मजकूर लिहिला आहे. या गाण्याची खासियत मला आणखी एक वाटते , गाण पाहताना दोन स्क्रीन दिसतात , एकावर राखी जी दिसतात तर दुसऱ्या स्क्रीन मध्ये पाठीमागे धरमपाजी दिसतात. हा कल्पनाविष्कार खूपच उत्तमरित्या चित्रित केला आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेला ब्लॅकमेल हा विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट. भलेही चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही पण संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचं एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचं संगीत नक्कीच उजवं ठरतं. गाणं कसं चित्रित करावं यावर आनंदजी यांची चांगली पकड असायची त्यानुसार त्यांनी अनेक चित्रपटातून याची झलक दाखविली आहे पण य...

साथीया, ये तूने क्या किया- एस.पी.बी.

इमेज
  एस. पी. बालासुब्रमण्यम अर्थात एस.पी.बी. या नावाने परिचित असलेले प्रसिद्ध गायक कलाकार आज अनंताच्या प्रवासास निघून गेले. एक दुजे के लिए मधील “आप्पडिया”, “मेरे जीवन साथी, प्यार किये जा”, “सच मेरे यार है बस वही प्यार है”,   म्हणून कमल हसन यांचा स्वर आपल्या सर्वांच्या परिचयाचा, अगदी त्याच प्रमाणे सलमान खान याचा स्क्रीन वरील आवाज म्हणून देखील आपण एस.पी.बी. ना ओळखतो , “ आजा शाम होने आयी”, “साथीया ये तूने क्या किया”, अशी एक ना अनेक गाणी आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, एस.पी.बी यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, अनंतपुर येथे इंजीनीअरिंग पदवी साठी प्रवेश घेतला होता पण संगीताची आवड आणि त्यातील रुची यामुळे इंजीनीअरिंग “ड्रॉप आउट” हा शिक्का भाळी घेऊन त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. याच काळात एस.पी.बी. यांनी चेन्नई इन्स्टिटयूशन ऑफ इंजीनियर येथे प्रवेश घेतला. तिथे विविध संगीत स्पर्धांमध्ये एस.पी.बी. भाग घेत, त्यांच्या गायकीचे सर्वच फॅन होते, क्षणास थांबविण्याचं कसब त्यांच्या कडे होतं, अशाच विविध स्पर्धांमध्ये प्रख्यात तेलुगू चित्रपट संगीतकार एस. पी. कोडानाडपानी (एस.पी...

फेसबुक अकाऊंट हॅकर्स पासून सावधान

इमेज
  ---फेसबुक मेसेंजरवरील संवाद---- संजना : हाय सुमित, कैसे हो? सुमित : मै एकदम मस्त, तुम कहो ? (सुमितला प्रश्न पडतो कि संजना अचानक हिंदी मध्ये का बोलते आहे? पण तो तिला उत्तर देतो) संजना: यार, थोडे पैसे कि जरुरत है, लॉक डाऊन कि वजह से हाल बेहाल है .... तुम मदत करोगे इसलिये तुमसे बात कर रही हुं..... 9******20** इस नंबर पर १०,०००/- भिजवा दो, प्लीज   वरील संवाद ओळखीचा / कुठेतरी वाचण्यात / ऐकण्यात आलेला असावा तुमच्या, या महामारीच्या काळात असे अनेक मेसेजेस फेसबुक मेसेंजर वर अथवा whatsapp वर आलेले आणि फसगत झालेले मित्र / परिचयातील व्यक्ती तुम्ही पाहिले असतील. हॅकर्स तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉग इन करतात आणि मित्र परिवारा कडून पैशाची मागणी करतात. आपला मित्र / मैत्रीण अडचणीत आहे समजून मदत केली जाते आणि इथेच फसगत होते. तुमच्या फेसबुक अकाऊंट ची काळजी तुम्हीच घेणे अपेक्षित आहे, आज काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही अमलात आणल्यास यास प्रतिबंध करणे शक्य होऊ शकेल. साधारण लॉक डाऊन सुरु होण्यापूर्वी भारतीय मंडळी दिवसभरातील १५० मिनिटं सोशल मीडिया साठी देत होती ती लॉक ...

आजा सनम मधुर चांदनी में हम- हसरत

इमेज
  प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी (इकबाल हुसेन) हिंदी चित्रपट सृष्टीस मिळालेले शीघ्र कवी वाटतात मला, "'तेरी प्यारी सुरत को, किसकी नजर ना लगे", एका लहान बाळाला पाहून सुचलेले हे शब्द ज्याचे गीतात रूपांतर झाले. तसेच एका पार्टीत एका अभिनेत्रीने परिधान केलेला पेहराव पाहून सुचलेले शब्द,  "बदन पे सितारे लपेटे हुए", या दोन्ही गीतांना परिचयाची गरज नाही, ती आजही अगदी "दिल के करीब" आहेत, मला खात्री आहे तुमच्याही ओठांवर हि गाणी असतीलच. सोबतच “चोरी चोरी” चित्रपटातील "आजा सनम मधुर चांदनी में हम", हे देखील गीत असावं.  साधारण ३५० चित्रपट आणि २००० पेक्षा जास्त गाणी सोबतच अनेक गजल, शेर त्यांच्या नावे आहेत. किशोर दा नी गायलेलं "जिंदगी एक सफर" (१९७१) अजरामर गीत असो कि "एहसान तेरा होगा मुझपर" (१९६१) रफी साहेबांचा जादुई आवाज लाभलेलं गीत, हि गीतं म्हणजे एका वेगळ्या भाव विश्वात रममाण करतात, क्लासिकल मायस्ट्रो मन्ना डे यांनी गायलेलं "आओ ट्विस्ट करें" (१९६५) हे भूत बंगला या चित्रपटातील इझी गोईंग गीत आणि तितकंच संवेदनशील "दुनिया बनानेवाले...

‘अहंकार’ हा सोडूनी द्यावा

इमेज
  लहान मुले म्हणजे देवा घरची फुले म्हणतात ,  ते उगीच नाही ,  लहान मुलांमध्ये जी निरागसता असते ती आहे तशीच राहत नाही व्यक्ती मोठा होईल तसे हि लोप पावत जाते आणि त्याची जागा  “ इगो ”  अर्थात अहंकाराने व्यापली जाते. हा  “ इगो ”  कुठेच थारा लागू देत नाही पण माणूस त्यास खूप जपतो. लहान मुलं भांडतात पण लागलीच दोस्तीही होते तसे मोठ्यांचे होते का ?  याचे उत्तर नकारार्थीच मिळते ,  असे होण्याचे कारण  “ इगो ”,  हा भावच मुळी लागलीच विचार व्यापून टाकतो ,  माणसास दुसरे काही सुचतंच नाही असे म्हणा हवे तर ,  मग हा  “ इगो ”  घेवून माणूस जिकडे जाईल तिकडे मिरवीत असतो ,  समर्थांनी दास बोधात कुविद्या लक्षण सांगताना दुसऱ्या दशकातील तिसऱ्या समासात गर्व, ताठा, अहंकार यांचा उल्लेख केला आहे आणि यापासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला दिला आहे. याकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे जे जे सोडून देण्यास सांगितले आहे ते ते मनुष्यप्राणी अगदी घट्ट धरून ठेवतो आणि त्याचा त्रास स्वत:ला करून घेतो (अपवाद वगळता). मला वाटतं  “ इगो ” च वर्गीकरण करावं ,...

पुढच्या वर्षी ये रे लवकर .... तुझी वाट बघतोय ...

इमेज
  गणपती बाप्पा सर्वांचे श्रद्धास्थान , प्रत्येक वर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणारे असंख्य भक्त आहेत. त्यापैकी मी एक ! श्री गणेश चतुर्थीला आगमन होण्याच्या काही दिवस अगोदर पासून स्वागताची तयारी आणि नंतर निरोप देण्यासाठी मनाची तयारी ! काल फेसबुक वर एक सुंदर चित्ररूपी संदेश वाचायला मिळाला (लेखकाचे नाव त्यात दिलेलं नव्हतं) आणि वाटलं “ प्रत्येकाच्याच भावना आहेत या ! ” त्यात एक मनाला स्पर्शलेला , भावलेला संदेश असा होता , “ तुझी पाठमोरी आकृती बघितली कि तू चालल्याची जाणीव मनाला होते , वाटतं तू मागे वळून बघशील.... ” पण बाप्पा ठरलेल्या दिवशी येतो आणि ठरलेल्या दिवशी त्याच्या गावाला निघतो पण जाताना आशीर्वाद नक्कीच देतो... असा प्रत्येकाचा विश्वास असतोच असतो. बाप्पाचे स्वागत करताना जोश , उत्साह कुठून येतो याचं गुपित मला अद्यापही उलगडलेलं नाही , कुठल्याही बाप्पाच्या मिरवणुकीत (या वर्षी मिरवणूक नसणार) तुम्हाला उत्साह पहायला (लहान थोर सगळ्यात हा उत्साह सारखाच) मिळेल , मग तो पारंपारिक लेझीमचा खेळ करताना असेल , झांज वाजविताना असेल अथवा एखादा वाद्यवृंद असेल , ढोल ताशा असेल , कुठून येतो हा उत्...