पोस्ट्स

दुसरं महायुद्ध, “चले जाव” आणि स्वातंत्र्य

इमेज
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना , अनेक विचार मनात घोळत राहतात, आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले का? आपण त्याचा योग्य वापर करीत आहोत का? खरी लोकशाही रुजविण्यात आपण भारतीय नागरिक म्हणून यशस्वी झालेलो आहोत काय? नैतिक मूल्य जोपासली जातात का? संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकवेळी सांगितले जातात पण कर्तव्यांची जाणीव झालेली आहे का? नसेल झालेली तर ती कधी होणार? अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण याची उत्तरं एक भारतीय म्हणून आपल्यालाच शोधावी लागतील, “मी भला आणि माझं घरं भलं” असे म्हणून चालणार नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो पर्यायाने देशाप्रती आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवायची जास्त गरज वाटते मला. देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर आहेत, देशावर होणारा कोणत्याही प्रकारचा आघात ते परतवून लावू शकतात. पण देशांतर्गत उद्भविणाऱ्या संकटांना एक भारतीय म्हणून आपल्यालाच सामोरे जावे लागेल. २१ व्या शतकात डिजिटल युद्धास आपण नकळत सामोरे जात आहोत, वेळीच जागे होणे क्रमप्राप्त आहे. या युद्धात देशाची संपत्ती असलेल्या युवक वर्गास लक्ष्य केलं जात आहे. ...

शापित

इमेज
  आयुष्यात अग्रेसर रहावं असे सगळ्यांना वाटतं. आयुष्यात सर्जनशील असणं खूप महत्वाचं असतं , ते एक उत्तम कौशल्य आहे, सगळ्यांकडे ते असावं पण असेलचं असे नाही. शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना थोडा वेगळा विचार केल्यास त्यास “सर्जनशील” असे नामकरण केले जाते, किंबहुना सर्जनशील लोक विविध भूमिकां मध्ये त्याचां योग्य वापर करू शकतात. सर्जनशीलता म्हणजे केवळ कलात्मकता असणे नाही, या क्षमतेचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण मार्ग विकसित करणं. ही “सर्जनशीलता”असावी का? तर त्याचे उत्तर होकारार्थी आहे, हो ती असावी !! पण किती असावी ? कोणत्या विषयात असावी? कुठे असावी? याची उत्तरं तुम्हालाच शोधावी लागतात. ही उत्तरं शोधत असताना तुम्हाला काही नवीन चेहरे पहाण्यास, अनुभवण्यास मिळतात, नवा “तगडा” अनुभव मिळतो आणि हो सर्वात महत्वाचं , एक नवा प्रश्न तुम्हास पडतो की तुम्ही “सर्जनशील” का आहात? हे सगळं अॅट वॉट कॉस्ट ?? कॉस्ट फॉर ऑपर्चुनिटी की ऑपर्चुनिटी कॉस्ट? मिळविलेल्या, निर्माण केलेल्या संधीसाठी खर्ची घातलेला वेळ, श्रम, पैसा सारं सारं व्यर्थ होतं.. आपण काहीच करू शकत नाही. काही करू शकत ...

पंचम

इमेज
  “ याद आ रही है , तेरी याद आ रही है” , २७ जून पंचम ‘दा’ चा ८ ३ वा वाढदिवस , कालच एका FM वर वाढदिवसाच सेलिब्रेशन सुरु झालं होतं आणि मनात पंचम च्या संगीताची लहर उमटली आणि त्यांची विविध सदाबहार गाणी भाव-विश्वात तरळू लागली. संगीताची जाण आणि विविध रागांवर असणारी पकड पंचमदा ं ची जमेची बाजू होती. पंचमदा बाबतीत एक किस्सा ऐकिवात आहे , जेंव्हा युवा पंचम ने संगीत देण्यास सुरुवात केली तेंव्हा ते फारसे कोणास परिचित नव्हते , पण त्यांचा एक परिचय सर्वश्रुत होता तो म्हणजे महान संगीतकार एस.डी.बर्मन यांचे सुपुत्र !! जेंव्हा पंचम कुठे बाहेर जात तेंव्हा लोक म्हणत , “ वो देखो एस.डी.बर्मन का बेटा जा रहा है |” काही कालावधी नंतर जेंव्हा पंचम दा ना पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांचे संगीत लोकप्रिय झाले तेंव्हा एस.डी. बर्मन  यांना पाहताच लोक म्हणू लागले , “ वो देखो पंचम के पिताजी जा रहे है |” एका बापाला याच्या पेक्षा कोणते मोठे सुख असेल कि त्याला त्याच्या मुलाच्या कर्तृत्वा मुळे लोक ओळखू लागतात. हिंदी चित्रपट सृष्टीत एस.डी.बर्मन म्हणजे वटवृक्ष , या वटवृक्षाच्या छायेत वाढायचं आणि स्वत:च वेगळ अस्तित्व निर्म...

कर्मचारी आणि संबंध

इमेज
    कोणत्याही संस्थेसाठी / कंपनीसाठी त्याचा कर्मचारी हा अॅसेट असतो. त्याच्या सहकार्याने संस्था/ कंपनी पुढे वाटचाल करीत असते. कर्मचारी वर्गासोबत असणारे नाते हे कंपनीच्या / संस्थेच्या फायद्याचे ठरत असते. अनेक उदाहरणातून हे सिद्ध झाले आहे कि जिथे कर्मचारी वर्ग आनंदी असतो तिथे उत्पादन/ विक्री उत्तम होते. पण कर्मचारी वर्गसोबत नाते संबंध प्रस्थापित करणे आणि सोबत एक लक्ष्मण रेषा आखून ठेवणे हे देखील तितकच महत्वाच असतं , हे ज्यांना जमलं त्यांना व्यवसायातील महत्वाची बाब जमली असे मी म्हणेन. तुमच्या कंपनीची काम करण्याची एक सिस्टम हवी , त्या सिस्टमनी   तुमची कंपनी चालली पाहिजे , हे ध्यानात घ्यायला हवे , बऱ्याच वेळा काय होतं , कर्मचारी त्यांच्या सोई प्रमाणे काम करतात आणि मग अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ मालकावर येते , असं होऊ नये त्यासाठी सिस्टम तयार करा.   कंपनीतील कर्मचारी वर्गा सोबत कंपनीचे कंत्राट , भावनिक , व्यावहारिक स्वरुपात संबंध प्रस्थापित होवू शकतात , यातील प्रत्येक पैलूस महत्व द्यायला हवे. एक चांगला कर्मचारी संबंध कार्यक्रम हे सुनिश्चित करते की सर्व कर्मचार्‍यांना न...

काश्मीर फाइल्स - मार्दव रक्तलांछन

इमेज
            “काश्मीर फाइल्स” सोशल , इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सध्या   ट्रेंडिंग आहे,   हा चित्रपट पाहून अनेक मंडळींनी त्यांची मते व्यक्त केली. चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला , हे सल्ले कुणी कुणी दिले त्याच्या बातम्या रोज येऊन धडकतात, त्यावर प्रतिक्रिया देखील देऊन काही मंडळी मोकळी झाली पण ही प्रतिक्रिया म्हणजे काय तर कुणी अंधभक्त, तर कुणी ह्या पक्षाचा, कुणी ह्या समाजाचा म्हणून त्याच्या कॅटेगरी ठरविण्यात आल्या. व्यक्त होणं सोडून देणं घातक वाटतं पण ‘व्यक्त’ झाल की लागलीच शिक्का मारला जातो हे कुठेतरी टोचतं तरी आज लिहितो आहे. इतिहास पाहायचा तर आता चित्रपट गृहात पाहायचा काय? त्यासाठीच सिनेमा आहे की काय? खरेतर समाजाचा आरसा म्हणजे सिनेमा, ठरवलं तर जे चांगल आहे ते घ्यायला काहीच हरकत नाही पण ..   असो एक ना अनेक प्रतिक्रिया उमटत असताना डोक्यात विचार येतो की “राजकारणाची फोडणी” दिल्याशिवाय आता देशात काही करता येत नाही काय? अभिव्यक्ति स्वातंत्र्य हा “फक्त गुळगुळीत शब्द” बनून राहू पहात आहे की काय? आपण व्यक्त होताना ते अभ्यासपूर्ण असाव एवढच...

स्टार्टअप – सुरुवात कशी करावी ?

इमेज
  स्वत :चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे. तुम्ही कोणत्याही स्टार्टअप कल्पनेवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे.   १.       तुम्ही तुमच्या स्टार्टअप कल्पनेवर उत्कट (पॅशनेट) आहात काय ? २.    ...

सॉफ्ट स्किल्सचे महत्व

इमेज
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. ही कौशल्यं   अचानक महत्वाची झाली का? पूर्वी ही कौशल्यं   लागत नव्हती आणि अचानक यांची मागणी वाढली ? असं काही नाही, तर याची गरज पूर्वीही होतीच फक्त त्याचे महत्व मागील पाच-दहा वर्षात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. करिअरची निवड करताना यास अनन्य साधारण असे महत्व आहे आणि ते यापुढेही राहील. विद्यार्थ्यानी या गोष्टीस प्राधान्याने आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे सॉफ्ट स्किलची गरज तुम्हास भासणार नाही. शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी सॉफ्ट स्किल्स महत्वाची भूमिका पार पाडतात. सॉफ्ट स्किल्स तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हास उत्कृष्ट मदत करतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे असे जग असते, या जगात त्यास सांभाळून घेणारी मंडळी आजूबाजूस असतात पण जेंव्हा करिअरचा प्रश्न येतो अथवा जॉबला जाण्याचा प्रश्न येतो तेंव्हा सॉफ्ट स्किल्स बाहेरील जगास सामोरे जाण्यासाठी आणि सहकारी मंडळीं सोबत सहयोगी पद्धतीने कार्य करण्यासाठी आवश्यक ठरतात.           सॉफ्ट स्किल्स ज्यास आपण साम...