पोस्ट्स

स्वराज्याचे दुसरे छत्रपती : इतिहास, पराक्रम आणि सत्य

इमेज
  इतिहासातील विविध विषय समजून घेणे , अधिक माहिती घेण्याचा, मिळविण्याचा प्रयत्न करणे ही आवडच, याच आवडीतून इतिहास समजून घेऊन त्याची माहिती इतरांना देणे, हा पण एक छंदच. मागील वर्षी “छावा” चित्रपट प्रदर्शित झाला, आणि जी त्रोटक माहिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वाचली होती, ती अधिक समजून घेण्या विषयी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मग कादंबरी वाचन असेल, अथवा ऑनलाइन संकलन असेल. ऑनलाइन ! म्हंटल की भुवया उंचावल्या जाऊ शकतात, कारण तेथील उपलब्ध माहितीच्या सत्यतेवर   शंका घेतली जाऊ शकते. विकिपीडिया सारखे माध्यम ज्यात कुणीही बदल करू शकतं . ते किती सत्य माहिती देऊ करतं हा अभ्यासाचा विषय , म्हणून स्पष्ट पणे नमूद केलं की सत्यतेवर सिद्ध होऊ शकेल अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो खरा पण अद्याप “ज्ञानाची (छत्रपती संभाजी महाराज   समजून घेण्याची ) भूक” काही शमली नाही. “संभाजी” या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची एक नवी विडिओ बाइट पाहिली त्यात इतिहासातील कोणत्या लेखनाची विश्वासार्हता अधिक या विषयी माहिती दिली आहे. शुद्ध ऐतिहासिक लेखन महत्वाचं....

वारसा जपणं आम्हाला झेपेल का ?

इमेज
  काही इतिहासकार (?) “छावा” चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून एवढे बेचैन झाले आहेत की राजे , औरंग च्या हाती लागले , पकडले गेले त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या तरी राजेंनी शरणागती पत्करली नाही, धर्माभिमान जागृत ठेवला पुढील पिढीस हाच धर्माभिमान कायम प्रेरणा देत राहिला आणि राहील यात शंकाच नसावी. हे सारं महत्वाचं राहीलच नाही, फितुरी कुणी केली ? त्याची जात काय होती? या साऱ्या गोष्टीत जात कशी घुसडता येईल हे महत्वाचं. दुर्दैव आहे !! ३३६ वर्ष झाली अजूनही छत्रपती संभाजी महाराज काय होते हे समजून घेताना जाती पातीवरून ए आय च्या युगात सोशल मीडिया रंगवणं सुरू आहे. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास समजून घेणं , पुढील पिढीस तो सांगणं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे विसरून चालणार नाही.   काही इतिहासकार (ब्राह्मण नसलेले) ज्यांनी संशोधन केलं आणि पुस्तकं लिहिली, छत्रपती संभाजी महाराज सर्वाना समजावेत यासाठी परिश्रम घेतले अशी सारी मंडळी सांगतात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरी मुळे राजे, औरंगच्या हाती सापडले... पण एक रील अचानक छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फिरतं आहे, त्यात कुणी फ्रेंचचा र...

छावा

इमेज
  आईचं प्रेम हे महत्वाचं असतच, ज्यास ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, असचं असतं. बालपणात तर सर्वात जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने जर कुणाची आई हिरावून नेली तर, हा विचार देखील करवत नाही. ज्यांना ह्या दू:खातून जावं लागलं ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. अगदी हेच आपल्याला लक्ष्मण उतेकर यांच्या “छावा” मध्ये पहायला मिळेल. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला सोस आला असा हा सिंहाचा छावा आयुष्यात प्रत्येक आघाडीवर झुंझत राहिला, पण त्याने कधीही हार मानली नाही. खरं तर तीन तासांच्या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना  जाणून घेणं केवळ अशक्य पण उतेकर यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. स्व. शिवाजी सावंत यांनी ८८६ पृष्ठ संख्या असलेल्या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज मांडण्याचा , समजावून सांगण्याचा, रणधुरंधराची कथा आजही इतिहासाची साक्ष देते आहे. अवघं बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला राजा पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाई करणारा लढवय्या सेनानी म्हणून ज्य...

अनसीन स्टेप्स : बिहाइंड सक्सेस

इमेज
अनसीन स्टेप्स : बिहाइंड एव्री सक्सेस   जीवनातील आव्हानं ही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांना स्विकारा आणि तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घ्या. यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास हवाच. मला वाटतं स्वप्न पाहणे ही एक सुरुवात असते, ती साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यकच असतात. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवा. असे प्रेरक विचार आपण वाचतो आणि त्याप्रमाणे आयुष्यात मार्गस्थ राहण्याचा निर्धार ही करतो. प्रवास कोणताही असो तो तुम्ही एन्जॉय करता की नाही यावर बरचं काही अवलंबून असतं, आयुष्याचा प्रवास असो अथवा शैक्षणिक, व्यावसायिक असो, तुमची एन्जॉयमेंट मॅटर्स ! तसे पाहिलं तर आमच्या कामतकरांकडे व्यवसाय करणारा मीच पहिला ! त्यामुळे जमेल का? स्थैर्य मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न, व्यवसाय कसा करावा याचं बाळकडू मिळालेलं आहे का? तर अजिबात नाही, पण मनात निश्चय पक्का , प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी सोबतच बाबा-आईचं मनोबल, पाठीशी आशीर्वाद, माझी बहीण आणि माझा विवाह झाल्यानंतर पत्नी यांच्या प्रेरणे मुळे, भक्कम पाठिंब्या मुळे व्यवसाय करणं मी शिकत राहिलो आणि आजही शिकतो...

एआय शिक्षकांची जागा घेईल ?

इमेज
   “माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे “हात” धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, हा संदेश कदाचित तुम्ही देखील वाचला असेल, आताच युग हे एआय (आर्टिफिश्यल इंटेलिजेंसच) युग, बऱ्याच गोष्टी एआय मुळे बदलत आहेत. पण खरच एआय शिक्षकांची जागा घेऊ शकेल? हा प्रश्न बरेच दिवस मनात घोळतो आहे, कारण पहा “जनरेटीव एआय” ने खूप कमाल केली आहे. एका कंपनीचे अथवा स्वत:चे प्रॉफिट लॉस शिट वाचण्याचे तंत्र प्रत्येकास आत्मसात असतेच असे नाही, आता जनरेटीव एआयला हा प्रश्न विचारला तर लागलीच पूर्ण प्रॉफिट लॉस शिट एआय समजावून सांगेल. तेही काही क्षणात आणि अगदी तुम्ही म्हणाल त्या भाषेत !! मग ही कमालच म्हणावी लागेल. अगदी ह्याच प्रकारे कायदेशीर, वैद्यकीय सल्ला देखील एआय देऊ करीत आहे. अर्थात त्याच्याकडील डेटाच्या आधारेच हे सारं सुरू आहे. माणसाने मशीन्सना पुरविलेल्या माहितीच्या आधारे अनेक अचंबित करणारे निकाल एआय देऊ करीत आहे. काही ठिकाणची जॉब्स जातील तर काही जॉब्स नव्याने तयार होतील. जॉबची नावे बदलतील या साऱ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत हे नक्की ! आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंटेरनेटच्या मायाजाळात माहिती सह...

अँग्री यंग मेन

इमेज
  “आज ! खुश तो बहोत होगे तुम” हा डायलॉगच एवढा दमदार आहे, की तो चित्रपटगृहांत ज्याने कोणी पाहिला तो त्या शॉट वर फिदा झाला नाही, तर नवलचं !! ही संवाद लेखकाची जादू तर आहेच पण तो ज्या ताकदीने अमितजींनी सादर केला आहे त्यास आजतागायत तोड नाही. ७० च्या दशका पासून ते अगदी ९० च्या दशका पर्यन्त कथा, पटकथा आणि संवाद यावर मजबूत पकड असणारे दोन मित्र ! ज्यानी बॉलीवूडला अनेक हिट्स, सुपर डुपर हिट्स चित्रपट दिले,  अनेकांचे संसार या जोडीमुळे उभे राहिले, हो संसार ! आजही ही मंडळीनी “शो” ची तिकटे सांभाळून ठेवलेली आहेत. ज्यावर त्यांची पहिली कमाई झाली , ती तिकिटे !! थोड आश्चर्य नक्कीच वाटेल पण खरं आहे. तर, दमदार संवाद, कथा आणि पटकथा याचे धनी सलीम-जावेद, यांनी चित्रपटात अनेक प्रयोग केले. “ अँग्री यंग  मॅन ” हे बिरुद अमितजीना यांच्या मुळेच मिळालं ! प्रकाश मेहरा यांना “जंजीर”च कथानक आवडलं पण या कथेत चित्रपटाच्या नायकास एकही गाणं नव्हतं, (संगीत प्रधान चित्रपटांचा काळ) त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी “जंजीर” नाकरला होता. त्यातच एके दिवशी महमुद यांचा “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना स...

व्यवसायाची निवड आणि आवड

इमेज
  व्यवसायाची निवड आणि आवड या दोन्ही गोष्टी एकास एक संगती या प्रमाणे आहेत. व्यवसायाची आवड असल्यास निवड योग्य होवू शकते आणि व्यवसायाची निवड योग्य असल्यास त्यात आवड निर्माण होणे हे क्रमप्राप्त होते. बऱ्याच वेळा व्यवसाय हा ना-इलाज म्हणून स्विकारणारी काही मंडळी असतात, अशा परिस्थितीत व्यावसायिकता येणे खूप कठीण असतं, अर्थात हे विविध उदाहरणाने सिद्ध करता येऊ शकते, आज तो विषय नाही म्हणून मी त्यावर प्रकाश नाही टाकत. पण व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की “व्यावसायिकतेचा पोशाख” हा घालावाच लागेल. व्यवसायाची निवड करीत असताना सामाजिक गरज (मागणी) या विषयाकडे पाहणे मला जास्त योग्य वाटते, समाजास काय हवं आहे, कशाची मागणी होत आहे ते सहज उपलब्ध करता येऊ शकतं का? त्यावर व्यवसाय करता येऊ शकेल का? त्यातून नवोन्मेश साध्य करता आला तर म्हणतात ना सोन्याहून पिवळं !! अगदी तसच काही..... व्यवसायास करिअर म्हणून निवडताना मला आवडत, मला जमतं आणि समाजास त्याची गरज (मागणी) आहे हि त्रिसूत्री लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याची काळजी घेतली तर निवड कधीच चुकणार नाही आणि तुमचं व्यवसायात यशस्वी होणं पक्क म्...